शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:44 IST

BJP Girish Mahajan News: बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाचा विषय वेगळा होता. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही त्यातून शिकायला हवे. आपला ब्रँड राहिला कुठे, याचा विचार करायला हवा, अशी टीका करण्यात आली आहे.

BJP Girish Mahajan News: ठाकरे गट अजून संपायचा बाकी राहिला आहे का, तुम्ही ज्या ब्रँडचा विषय करत आहात, शिवसेनेचा विषय करत आहात, ती शिवसेना आणि तो ब्रँड आता तुमचा राहिलेलाच नाही. ज्यावेळेस तुम्ही काँग्रेससोबत गेलात, तेव्हाच तुमचा ब्रँड संपला. २०१९ ला तुम्ही आमच्यासोबत राहिलात, निवडून आलात, ५५ लोक तुमचे आले. आमचेही १०६-१०७ लोक आले होते. एवढे लोक निवडून येऊनही तुम्ही आम्हाला सोडून तिकडे गेलात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात, त्याचवेळेस तुमचा ब्रँड संपला, अशी टीका भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेना जमीनदोस्त होत नाही, कारण शिवसेना जमिनीचा दोस्त आहे, म्हणून तुम्ही संपवू शकत नाही. आमचे पाय जमिनीवर आहेत आणि आमची मूळे जमिनीच्या खाली गेलेली आहेत. ठाकरे म्हणजे सदा सर्वदा संघर्ष, हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलेलो आहोत. ठाकरे ब्रँड हा आम्ही तयार केलेला नाही. तो लोकांनी स्वीकारला आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, तर जनतेशी प्रामाणिक आहोत. ठाकरे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत. आपल्या वेदनेला निर्भीड वाचा फोडणारे आहेत, हे जनतेला माहित आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्याबरोबर आहे. ठाकरेंनी महाराष्ट्र, मराठी अस्मिता आणि हिंदू अस्मितेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच काम केले . आमची ही ओळख अनेकांनी पुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, आमची ओळख पुसू इच्छिणारेच पुसले गेले. ठाकरे म्हणजे नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे मराठी माणसाची, महाराष्ट्राची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे, असे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर टीका केली.

मार्केटमध्ये असे ब्रँड येतात आणि जातात

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाचा विषय वेगळा होता. त्यांचे विचार वेगळे होते. त्यांची आयडिओलॉजी वेगळी होती. तुम्ही साध्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही त्यातून काही शिकायला हवे. आपला ब्रँड राहिला कुठे, याचा विचार करायला हवा. मार्केटमध्ये असे ब्रँड येतात आणि जातात. काही पडद्याआड जातात, त्यातलाच हा प्रकार आहे, या शब्दांत गिरीश महाजन यांनी निशाणा लगावला. तसेच उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यावर मराठीत बोलतात का, दिल्लीत गेल्यावर फक्त मराठीतच बोलणारे, असे कसे चालेल. आपल्या मराठी भाषेचा अभिमान आहेच, पण भारतासारख्या देशात दुसऱ्या भाषेचा द्वेष करून चालणार नाही. आमच्या भाषेत बोलण्याचा आणि शिकण्याचा अधिकार आहे. परंतु, दुसऱ्या भाषेचा द्वेष योग्य नाही. फक्त निवडणुका आल्या की, हे विषय का निघतात, हे मला समजत नाही, असे गिरीश महाजन म्हणाले.

दरम्यान, मी गेली ३५ वर्षे आमदार आहे. निवडणुका आल्या की, मुंबईला तोडणार, मुंबईला तोडून गुजरातला जोडले जाणारे, हा विषय पक्का येतो. हे यांचे नेहमीचेच आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायचे आहे, वेगळे करायचे आहे, असे बोलतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, कुणाच्या बापाची हिंमत नाही. बापाच्या बापाचीही नाही. एवढे सांगूनही कोणाच्या लक्षात येत नसेल आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, मराठी मतांवर डोळा ठेवून मुद्दाम अशा प्रकारची विधाने करत असतात. 

 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे