शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

एकत्र परिवार असतानाही कौटुंबिक कलहाची वारंवार अफवा; अजित पवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 4:13 PM

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

मुंबई : काल मी माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिला. यामुळे माझ्या वरिष्ठांना, हितचिंतकांना वेदना झाल्या. मी उपमुख्यमंत्री असतानाही असाच एक प्रसंग आला होता. मी कोणालाही न विचारता राजीनामा दिला होता. कालही हाच प्रकार केला. मी कार्यकर्त्यांचीही माफी मागतो, असे अजित पवार यांनी सांगितले. आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत भावनांना वाट मोकळी करून दिली. 

विधानभवनामध्ये मी 5.30 च्या सुमारास गेलो. विधानसभाध्यक्ष बागडेंच्या पीएकडे राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी मी त्यांना फोन केलेला, की तुम्ही मुंबईत कधी आहात असे विचारले होते. मी राज्य बँकेचा संचालक होतो. शरद पवार हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांचे नाव घेण्यात आले. राज्य बँकेने एखाद्या गिरणीला, कारखान्याला पैसे दिले ते त्यांनी कसे खर्च केले त्याची चौकशी केली तर मला काही आक्षेप नाही. अन्याय झाला तर न्यायपालिका आहेत. त्यांनी त्यांना हवा तो तपास करावा. मात्र, 2008 चे प्रकरण असताना आज निवडणुकीच्या काळात का गुन्हा दाखल केला. यामुळे शरद पवारांना या गोष्टीचा त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले. 

मी सकाळी मुंबईकडे निघालो. मात्र, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे निघाल्याने टोल नाक्यांवर माझे दोन दोन तास गेले. दुपारी 2 वाजता मी मुंबईत पोहोचलेलो. तोपर्यंत ईडीकडे न जाण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला होता. त्यामुळे माध्यमांनी लगेचच अजित पवार आले नसल्याची विचारणा सुरू केली. राजीनामा दिल्यानंतर मी मुंबईतील एका नातोवाईकाकडे थांबलो. शरद पवारांनी मला भेटण्यास सांगितले. आमच्यात कौटुंबीक कलह कुठून आले? असा सवालही त्यांनी केला. 

हे थांबवा...मी जेव्हा राजकारणात आलो, तेव्हाही आमच्यात कलह असल्याची चर्चा केली गेली. शरद पवार आणि अजितदादा यांचे दोन गट असल्याचे बोलले गेले. सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही हेच घडले आणि आताही तेच. पवार कुटुंब मोठा परिवार आहे. आमच्यात कोणतेही वाद नाहीत तेव्हा हे कृपया थांबवा असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस