शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 6:39 PM

महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेसाठी सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे (Disaster Management Initiative and Convergence Society) सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्राद्योगिक संस्था, मुंबई (आयआयटी), डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सह आयोजक आहेत. या जागतिक परिषदेत देशभरातील विविध राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी, आपत्ती निवारणाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, तज्ज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन सुध्दा मांडण्यात येणार आहे.

29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोध निबंध मांडता येणार असून हे शोध निबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोध निबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.

डीएमआयसीएसच्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैद्राबाद येथे 2008 मध्ये झाली. त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी परिषद सन 2017मध्ये विशाखापट्टणम येथे झाली. तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबई