शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:09 AM

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा,

मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.एका ८४ वर्ष वयाच्या शेतकºयाला न्याय मिळत नसल्याने मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या करावी लागते ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून धर्मा पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रालयाच्या चकरा मारत होते. त्यांनी मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. पण भ्रष्ट सरकारी यंत्रणेने पाटील यांच्या अर्ज आणि निवेदनावर काहीच कारवाई केली नाही.तीन महिने पाठपुरावा करूनही सरकारकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे गेल्या साडेतीन वर्षातसाडे तेरा हजारांपेक्षा जास्त शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयात येऊन शेतकरी आत्महत्या करतायेत. त्यांची मुले-मुलीही आत्महत्या करू लागले आहेत त्यांचा सरकारवर विश्वास नाही, त्यामुळे राज्यातील सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.मंत्र्यांनी जमीनखरेदी केलीच कशी?धर्मा पाटील यांनी विषप्राशन केल्यानंतर सरकारने वाढीव अनुदान देण्याची घोषणा केली. एका वयोवृद्ध शेतकºयाने आपला जीव धोक्यात घातल्यानंतर सरकारला जाग येते. त्यापूर्वी हे सरकार झोपले होते का? असा सवाल करुन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या भूसंपादनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना तत्कालीन आमदार व एक विद्यमान मंत्री प्रकल्पात गेलेली जमीन कशी खरेदी करू शकतात, असा सवाल विखे पाटील यांनी केला.रावल यांनी खरेदीकेलेल्या जमिनीची चौकशी करा-राष्ट्रवादीसरकारी प्रकल्प असणाºया गावातील जमिनी कवडीमोलाने खरेदी करून त्या महागड्या दरात विकण्याचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचा धंदाच असून त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून केली आहे.जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे.- खा. सुप्रिया सुळे,राष्ट्रवादी काँग्रेसही आत्महत्या नाही तर हत्या असून त्यास सरकार जबाबदार आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. राज्य सरकारला कलंक लावणारा हा प्रकार आहे. शेतकºयांचा आक्रोशही सरकारला ऐकू येत नाही. विकास हवा आहे पण शेतकºयांचे मृत्यू जर मंत्रालयाच्या दारात होत असतील तर असा विकास नको.- खा. संजय राऊत, शिवसेनाअन् शासकीय यंत्रणा झाली गतिमानफेरमूल्यांकन सुरू: प्रशासन खडबडून जागेधुळे : विखरण येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून विखरण व मेथी शिवारात संपादित केलेल्या १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे काम सुरू झाले आहे. पण सरकारची ही कृती उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी भावना गावकºयांनी व्यक्त केली.जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांनी आज दिवसभरात या जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्याचा अहवाल मंगळवारी मंत्रालयात होणाºया बैठकीत सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.शेतकरी धर्मा पाटील यांच्या शेतात झालेल्या झाडांच्या पंचनाम्यावर कुठलीही तारीख नाही, पंचाच्या सह्यासुद्धा नाहीत. जमीन मालकाची सही नाही. यावरून कृषी अधिकाºयांनी कार्यालयात बसूनच पंचनामे केले, हे सिद्ध होत आहे, असा खळबळजनक आरोप धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDharma Patilधर्मा पाटीलfarmer suicideशेतकरी आत्महत्या