शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा शपथविधी पाहून कसं वाटलं?; पंकजांनी स्पष्ट मत मांडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 20:23 IST

८० तासांच्या सरकारवर पंकजा मुंडेंचं भाष्य

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट अजित पवारांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यात एकच राजकीय भूकंप झाला. यावर भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणं हा माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा म्हणाल्या. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या ८० तासांच्या सरकारवर भाष्य केलं. फडणवीस आणि पवार यांचा २३ नोव्हेंबरला शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी राज्य राष्ट्रपती राजवटीमधून बाहेर पडलं याचा आनंद होता. पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदनदेखील केलं. पण या सरकार स्थापनेनं मला फार आनंद झाला नाही. तो माझ्यासाठी धक्का होता, असं पंकजा यांनी सांगितलं. अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे गनिमी कावा होता, असं फडणवीस म्हणाले होते. मात्र या गनिमी काव्याची भाजपामधील नेत्यांना कल्पनाच देण्यात आली नव्हती, असं पंकजा यांच्या विधानावरुन समजतं. फडणवीस आणि पवारांच्या शपथविधीबद्दल मला कोणतीही माहिती नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाची कल्पना नव्हती. त्यामुळे ज्यावेळी मी तो शपथविधी पाहिला, तेव्हा मला धक्का बसला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. अजित पवारांबद्दल मला फार बोलता येणार नाही, असं पंकजांनी म्हटलं. अजित पवार अतिशय स्पष्टवक्ते आहेत. पण माझा त्यांच्याशी फारसा संबंध आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही बोलू शकत नाही, असं पंकजांनी सांगितलं. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना