शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती; केवळ दोन दिवसांचा स्टॉक उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 9:13 AM

तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत.

नागपूर: राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये भीषण कोळसा संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्रे संवेदनशील स्थितीत पोहोचली आहेत. राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले असून, कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ कधीही बंद होऊ शकते. तीन दिवसांपेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्व वीज केंद्रे सध्या या श्रेणीत आली आहेत. महाजेनको सूत्रानुसार, वेकोलिकडून अनेक दिवसांपासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे केंद्रांमधील स्टॉक कमी होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी होत चालला आहे. सध्या रोजच्या पुरवठ्यावर भागवले जात आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट होती. ही पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. परंतु भविष्यात संकट उभे राहू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली नाही तर विजेची समस्या उभी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.वीज केंद्रातील कोळशाची स्थितीकेंद्र                     उपलब्ध स्टॉकखापरखेडा            ०.५ दिवसकोराडी                  २ दिवसचंद्रपूर                  १.५ दिवसनाशिक                १.५ दिवसपारस                  १.२५ दिवसपरळी                 १.७५ दिवसभुसावळ             १ दिवस

एनटीपीसी, खासगी क्षेत्रही होणार प्रभावित कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी केंद्रातील एक युनिट ठप्प आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानीच्या तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन घटले आहे. रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलची दोन युनिट बंद करावी लागली. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस नसल्याने बंद आहे.

बंद पडलेले युनिट कोळसा नसल्याने चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ बंद पडले आहे. कोराडीतील एक युनिट आपत्कालीन कारणांमुळे बंद आहे.   

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र