शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

शेतकऱ्यांनाही मिळणार उच्चदाब वाहिनीद्वारे वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 6:51 PM

राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरण : आयोगाने दिली परवानगी, उच्चदाब वाहिनीची करावा लागणार खर्चप्रलंबित यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार

पुणे : विद्युत आयोगाने कृषी वाहिनीला उच्चदाब वाहिनीतून वीज पुरवठा करण्यास परवानगी दिल्याने, कृषिवाहिन्या उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरीत करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अखंडित विद्युत पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, या प्रणालीद्वारे वीज मिळविण्यासाठी रोहित्र आणि वाहिनीचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. राज्यात मार्च-२०१८ अखेर पैसे भरुन प्रलंबित असणाऱ्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याच्या कामास सुरुवात झाली असून, काहींचा विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. डिसेंबर -२०१९ अखेरपर्यंत या शेतकऱ्यांना महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात येईल. या प्रणालीवर सुमारे ५ हजार ४८ कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र दिले जाणार आहे. त्यामुळे मालकी हक्काची भावना वाढीस मदत होईल. शिवाय अखंडित विद्युत पुरवठ्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होईल. याशिवाय रोहित्र नादुरुस्त होणे, तांत्रिक आणि वाणिज्यिक हानी कमी होण्यास मदत होईल.महावितरणने याबाबत आयोगाकडे याचिका सादर केली होती. त्यावर आयोगाने तातडीने सुनावणी घेवून १८ डिसेंबर २०१८ रोजी योजनेस मंजुरी दिली. यापूर्वी,शेतकऱ्यांना अशा पद्धतीने वीजपुरवठा देण्याची सुविधा उपलब्ध नव्हती. सध्या अस्तित्वात असलेल्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांना तसेच प्रलंबित यादीत असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या वितरण व्यवस्थेतून विज घेण्यासाठी उच्चदाब वाहिनी व रोहित्राचा खर्च शेतकऱ्यांना स्वत: करावा लागणार आहे. त्यानंतरच महावितरणद्वारे त्यांना नवीन वीजपुरवठा जोडून देण्यात येईल. तसेच, लघुदाब वाहिनीवरुन उच्चदाब वाहिनीवर स्थलांतरित केले जाईल. कृषी पंपधारक शेतकऱ्याचा कुठल्याही कारणास्तव कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झाल्यास, शेतकऱ्याने केलेल्या खर्चाच्या रक्कमेचा परतावा घसारा पद्धतीने दिला जाईल, असे महावितरणने स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणFarmerशेतकरीelectricityवीज