शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 08:13 IST

शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज की उद्धव ठाकरे हे राजकारणात चालणारा ब्रॅण्ड आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच कायमस्वरूपी ब्रॅण्ड

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच आमचा कायमस्वरूपी ब्रॅण्ड आहे. उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत आणि यापुढेही करतील. या प्रवासात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे ही दोन बाजू असलेले चलनी नाणे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने प्रहार ते प्रशासन असा धगधगता प्रवास केला आहे. सत्ता हे साध्य आहे, साधन नाही याची जाणीव बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमीच करून देत. आता कुणी प्रलोभनाने, कुणी कारवाईच्या भयाने शिवसेनेपासून दूर झाले असतील. शिवसेनेच्या निखाऱ्यांवर अधूनमधून राख जमते; पण ती तितक्याच तत्परतेने झटकलीही जाते. हेच या निखाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेने दिलदारपणे भाजपला हात दिला; पण भाजपने सुरुवातीपासूनच शत प्रतिशतचा नारा देत आपण कृतघ्न असल्याचेच दाखवून दिले. बाळासाहेबांच्या दिलदारपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडताना उभा महाराष्ट्र हळहळला. अडीच वर्षात कोरोनासारखं संकट असताना त्यांनी अद्भुत कामगिरी करत सर्वोत्तम मुख्यमंत्री असा सन्मान मिळवला. शिवसेनेची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही निश्चितच यशाकडे झेप घेणारी असेल. त्यामुळे यापुढेही उद्धव ठाकरे हेच नाव चालेल, यात शंकाच नाही. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल

राजकारणात कोणतीही परिस्थिती असो, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कायमच आपल्या विचारात सातत्य ठेवले आहे. मराठी, हिंदुत्वाचे मुद्दे त्यांनी कधीच सोडले नाहीत. जनता आज स्थिर विचारांच्या राजकारण्याच्या शोधात आहे. गेल्या अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ पाहिला तर तो निराशाजनकच आहे. गुढीपाडव्याचा मेळावा असो की संभाजीनगरची सभा; राज ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण हेच आहे. राजकारणातील चंचलपणाला कंटाळलेली जनता विश्वासार्ह नेत्याच्या प्रतीक्षेत आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक खंबीर नेते होते. त्यानंतर आतापर्यंतचे शिवसेनेचे राजकारण त्यांच्या पुण्याईवर चालले; पण आता मात्र शिवसेना नेते उघडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आतापर्यंतची वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे. बाळासाहेबांनंतर त्यांच्यासारखा नेता कोण, असा सवाल केला तर एकच उत्तर मिळते, राज ठाकरेच! मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत पक्षाच्या वाट्याला यश आले, तसेच अपयशही आले; पण अपयश पचवून वाटचाल सुरूच आहे. मोदी लाटेची तर सर्वच पक्षांना झळ बसली; पण कोणत्याही परिस्थितीत मनसेने आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. जनता या सगळ्यांचे अवलोकन करीत आहेच. त्यामुळे राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल. - संदीप देशपांडे, मनसे नेते 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतSandeep Deshpandeसंदीप देशपांडे