शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 08:13 IST

शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज की उद्धव ठाकरे हे राजकारणात चालणारा ब्रॅण्ड आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच कायमस्वरूपी ब्रॅण्ड

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच आमचा कायमस्वरूपी ब्रॅण्ड आहे. उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत आणि यापुढेही करतील. या प्रवासात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे ही दोन बाजू असलेले चलनी नाणे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने प्रहार ते प्रशासन असा धगधगता प्रवास केला आहे. सत्ता हे साध्य आहे, साधन नाही याची जाणीव बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमीच करून देत. आता कुणी प्रलोभनाने, कुणी कारवाईच्या भयाने शिवसेनेपासून दूर झाले असतील. शिवसेनेच्या निखाऱ्यांवर अधूनमधून राख जमते; पण ती तितक्याच तत्परतेने झटकलीही जाते. हेच या निखाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेने दिलदारपणे भाजपला हात दिला; पण भाजपने सुरुवातीपासूनच शत प्रतिशतचा नारा देत आपण कृतघ्न असल्याचेच दाखवून दिले. बाळासाहेबांच्या दिलदारपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडताना उभा महाराष्ट्र हळहळला. अडीच वर्षात कोरोनासारखं संकट असताना त्यांनी अद्भुत कामगिरी करत सर्वोत्तम मुख्यमंत्री असा सन्मान मिळवला. शिवसेनेची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही निश्चितच यशाकडे झेप घेणारी असेल. त्यामुळे यापुढेही उद्धव ठाकरे हेच नाव चालेल, यात शंकाच नाही. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल

राजकारणात कोणतीही परिस्थिती असो, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कायमच आपल्या विचारात सातत्य ठेवले आहे. मराठी, हिंदुत्वाचे मुद्दे त्यांनी कधीच सोडले नाहीत. जनता आज स्थिर विचारांच्या राजकारण्याच्या शोधात आहे. गेल्या अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ पाहिला तर तो निराशाजनकच आहे. गुढीपाडव्याचा मेळावा असो की संभाजीनगरची सभा; राज ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण हेच आहे. राजकारणातील चंचलपणाला कंटाळलेली जनता विश्वासार्ह नेत्याच्या प्रतीक्षेत आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक खंबीर नेते होते. त्यानंतर आतापर्यंतचे शिवसेनेचे राजकारण त्यांच्या पुण्याईवर चालले; पण आता मात्र शिवसेना नेते उघडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आतापर्यंतची वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे. बाळासाहेबांनंतर त्यांच्यासारखा नेता कोण, असा सवाल केला तर एकच उत्तर मिळते, राज ठाकरेच! मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत पक्षाच्या वाट्याला यश आले, तसेच अपयशही आले; पण अपयश पचवून वाटचाल सुरूच आहे. मोदी लाटेची तर सर्वच पक्षांना झळ बसली; पण कोणत्याही परिस्थितीत मनसेने आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. जनता या सगळ्यांचे अवलोकन करीत आहेच. त्यामुळे राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल. - संदीप देशपांडे, मनसे नेते 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतSandeep Deshpandeसंदीप देशपांडे