शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आमने-सामने: चालणारा ब्रॅण्ड कोणता, राज की उद्धव ठाकरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 08:13 IST

शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा राज की उद्धव ठाकरे हे राजकारणात चालणारा ब्रॅण्ड आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच कायमस्वरूपी ब्रॅण्ड

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हाच आमचा कायमस्वरूपी ब्रॅण्ड आहे. उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत आणि यापुढेही करतील. या प्रवासात उद्धवजी आणि आदित्य ठाकरे ही दोन बाजू असलेले चलनी नाणे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेने प्रहार ते प्रशासन असा धगधगता प्रवास केला आहे. सत्ता हे साध्य आहे, साधन नाही याची जाणीव बाळासाहेब शिवसैनिकांना नेहमीच करून देत. आता कुणी प्रलोभनाने, कुणी कारवाईच्या भयाने शिवसेनेपासून दूर झाले असतील. शिवसेनेच्या निखाऱ्यांवर अधूनमधून राख जमते; पण ती तितक्याच तत्परतेने झटकलीही जाते. हेच या निखाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. शिवसेनेने दिलदारपणे भाजपला हात दिला; पण भाजपने सुरुवातीपासूनच शत प्रतिशतचा नारा देत आपण कृतघ्न असल्याचेच दाखवून दिले. बाळासाहेबांच्या दिलदारपणाचा त्यांनी गैरफायदा घेतला. उद्धव ठाकरे यांनी वर्षा सोडताना उभा महाराष्ट्र हळहळला. अडीच वर्षात कोरोनासारखं संकट असताना त्यांनी अद्भुत कामगिरी करत सर्वोत्तम मुख्यमंत्री असा सन्मान मिळवला. शिवसेनेची पुण्याई त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय वाटचाल ही निश्चितच यशाकडे झेप घेणारी असेल. त्यामुळे यापुढेही उद्धव ठाकरे हेच नाव चालेल, यात शंकाच नाही. - अरविंद सावंत, खासदार, शिवसेना

राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल

राजकारणात कोणतीही परिस्थिती असो, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कायमच आपल्या विचारात सातत्य ठेवले आहे. मराठी, हिंदुत्वाचे मुद्दे त्यांनी कधीच सोडले नाहीत. जनता आज स्थिर विचारांच्या राजकारण्याच्या शोधात आहे. गेल्या अडीच वर्षांचा शिवसेनेचा कार्यकाळ पाहिला तर तो निराशाजनकच आहे. गुढीपाडव्याचा मेळावा असो की संभाजीनगरची सभा; राज ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्याचं कारण हेच आहे. राजकारणातील चंचलपणाला कंटाळलेली जनता विश्वासार्ह नेत्याच्या प्रतीक्षेत आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक खंबीर नेते होते. त्यानंतर आतापर्यंतचे शिवसेनेचे राजकारण त्यांच्या पुण्याईवर चालले; पण आता मात्र शिवसेना नेते उघडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने आतापर्यंतची वाटचाल आत्मविश्वासपूर्वक केली आहे. बाळासाहेबांनंतर त्यांच्यासारखा नेता कोण, असा सवाल केला तर एकच उत्तर मिळते, राज ठाकरेच! मनसेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या वाटचालीत पक्षाच्या वाट्याला यश आले, तसेच अपयशही आले; पण अपयश पचवून वाटचाल सुरूच आहे. मोदी लाटेची तर सर्वच पक्षांना झळ बसली; पण कोणत्याही परिस्थितीत मनसेने आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. जनता या सगळ्यांचे अवलोकन करीत आहेच. त्यामुळे राज ठाकरे हाच पुढच्या काळातील ब्रँड असेल. - संदीप देशपांडे, मनसे नेते 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतSandeep Deshpandeसंदीप देशपांडे