शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

काँग्रेस पक्षातील ‘पडझडी’ ची केंद्राकडून गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 4:54 PM

राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते.

राजू इनामदार पुणे: राज्यातील काँग्रेस पक्षात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या ‘ पडझडी’ची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे समजते. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे दोन वरिष्ठ निरीक्षक येत्या दोन दिवसांत मुंबईत दाखल होणार असून ते गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात घडलेल्या मध्यंतरीच्या काही धक्कादायक पक्षांतराच्या घटनांची चौकशी करणार आहेत. पक्षाला क्षीण करणाऱ्या या गोष्टींबाबत राज्य संघटनेतील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील, बॅरिस्टर अंतूले यांचे पूत्र नावीद  यांनी जाहीरपणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत दुसºया पक्षात प्रवेश केला आहे. त्याशिवाय पुण्यासारख्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्याबाबत सातत्याने घोळ घालण्यात येत आहे. गाडगीळ घराण्यातील आमदार अनंत गाडगीळ जाहीरपणे नाराजी व्यक्त करतात. या सगळ्याच गोष्टींचा अर्थ काँग्रेस नेतृत्त्वाने महाराष्ट्रात पक्षामध्ये काही गडबड सुरू आहे असा लावला आहे. राज्याचे प्रभारी असलेले मल्लिकार्जून खर्गे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी म्हणून अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने नियुक्त केलेल्या सोनल पटेल यांच्याकडे पक्षाध्यक्ष राहूल गांधी यांनी याबाबत विचारणा केली असल्याची माहिती मिळाली.ही सगळीच घराणी काँग्रेसबरोबर कायम एकनिष्ठ राहिली आहेत. पक्ष अडचणीत असतानाही त्यांनी पक्षालाच साथ दिली. असे असताना आता त्यांचे वारस पक्ष का सोडत आहेत असा प्रश्न राहूल गांधी यांनी विचारला. राज्यातील पक्षाचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्या मुलाने भाजपात प्रवेश केला, तरीही राधाकृष्ण विखे पदावर अजून कायम आहेत. ते मतदार संघात मुलासाठी म्हणून काँग्रेस तसेच भाजपाच्या नेत्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेत आहेत, याचा अर्थ काय काढायचा अशी विचारणा राहूल यांनी करून प्रदेश शाखेच्या एकूणच कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली अशी माहिती पक्षातील सुत्रांनी दिली.याआधीही राहूल यांनी प्रदेश शाखेने शिफारस केलेल्या राज्यातील उमेदवार यादीतील काही नावांबाबत हरकत घेत, ही नावे स्थानिक पदाधिकाºयांबरोबर चर्चा करून निश्चित केलेली नाही असे स्पष्ट मत खर्गे यांच्याकडे व्यक्त केले होते. प्रदेशाध्यक्षांकडे विचारणा करा व नवी यादी पाठवण्यास सांगा असेही त्यांनी खर्गे यांना सुचवले होते. याही वेळी त्यांनी खर्गे यांच्याकडे राज्याचे प्रभारी पद तुमच्याकडे असताना तिथे पक्षातून असे आऊटगोईंग सतत का सुरू आहे असे विचारले. त्यानंतरच अखिल भारतीय काँग्रेस महासमितीने दोन निरीक्षक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एकदोन दिवसात हे निरीक्षक मुंबईत दाखल होती असे समजते. दरम्यान महासमिताने पक्षाचे राज्यातील निवडणूक निरिक्षक म्हणून मधूसुदन मिस्त्री यांची नियुक्ती केली आहे. त्यांनाही पक्षांतर प्रकरणाची माहिती घेण्याबाबत महासमिताने आदेश दिले असल्याचे समजते. लवकरच ते मुंबईत दाखल होणार असून राज्याचा दौरा करणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी