शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

२४ तासांत शेतातल्या फळभाज्या थेट ग्राहकांच्या घरी; प्रयोगशील शेतकऱ्यांनी उघडली 'ऑनलाईन मंडई'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 1:42 PM

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे.

ठळक मुद्देअहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' उपक्रम सुरु केलाशेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.   सर्वसामान्यांसह सेलेब्रिटीही करतायेत ऑनलाईन भाजीखरेदी

देशात सध्या कोरोनाचं संकट समोर आहे, अशातच गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे, या संघर्षाच्या काळात अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी एका अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट शेतातील ताजी फळे, भाज्या पोहचवण्याचं काम हाती घेतलं आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलेब्रिटींनीही घरबसल्या भाजीपाला मागवला आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या शेतकऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेकडो ग्राहकांशी नातं जोडलं आहे. श्रीरामपूरमधील आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी थेट आपल्या शेतातून मुंबई- पुण्याच्या व अन्य शहरांतून जमलेल्या शेकडो ग्राहकांना भाजीपाला पोहचवण्याचं काम सुरु केले आहे. अहमदनगर व पुणे जिल्ह्यांतून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' ह्या ऑनलाईन मंडईची स्थापना केली आहे.

लॉकडाऊन काळात अनेक फळभाजी पुरवठादार व विक्रेते, उद्यमशील व्यक्ती व नवउद्योगांनीही ऑनलाईन व घरपोच भाजीपाला व फळे विक्रीचा उद्योग सुरु केला आहे. घरातून बाहेर पडू न शकणाऱ्या लोकांसाठी ही सोय असली तरीही याप्रकारच्या भाजीपाला व फळे पुरवठ्यात काही त्रुटी आहेत. यातील अनेकजण शेतकऱ्यांकडून घाऊक खरेदी करून, भाजीपाला व फळांचा साठा करून मागणीप्रमाणे पुरवठा करीत आहेत. यात ग्राहकांना आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक असलेला ताजा, पोषणमूल्ये टिकून असलेला व स्वच्छ भाजीपाला मिळत नसल्याने ग्राहक वंचित राहिले आहेत. यादृष्टीने, ग्राहकांना ताजा शेतमाल कसा असतो व कमीतकमी वेळेत थेट शेतातून तो दारी कसा पोहोचू शकतो, हे या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे.                 

अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 'किसान कनेक्ट' या 'शेतकरी उत्पादक कंपनी'ची अलिकडेच स्थापना केली असून कमीतकमी वेळेत ताजा शेतमाल घरपोच  पोहोचविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन असा प्रगतीशील व तंत्रज्ञानावर आधारित मंच उभा करण्याचा अहमदनगर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. या प्रयत्नाला मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर या शहरांतून शेतमालाला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.         

या उपक्रमामध्ये अनेक तरूण, सुशिक्षित, प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करीत भाजीपाला व फळांचे वितरण करण्याची व्यवस्था केली आहे. यात आधुनिक मशागत, पीक काढणी प्रक्रियेबरोबर मालाचे वर्गीकरण, बास्केट पॅकिंग व ग्राहक केंद्राच्या मदतीने विनाविलंब २४ तासात ग्राहकांच्या दारी भाजीपाला पोहोचविण्यासाठी शेतकरी भर देत आहेत. गेल्या तीन महिन्यांत 'किसान कनेक्ट'ने सुमारे ८० हजार फळभाज्यांच्या बास्केटस् मुंबई, पुणे व अन्य ठिकाणी वितरित केल्या आहेत. फळभाज्या ताज्या, शुद्ध व स्वच्छ राहून त्यांची हाताळणी होऊ नये यासाठी प्रथमच 'किसान कनेक्ट' खास बनविलेल्या बास्केटसमधून ग्राहकांना पुरवठा करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी