शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 18:00 IST

ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देगेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली तर भाजपासाठी सोप्प जाईल. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली

मुंबई - मातोश्री, वर्षामध्ये जे महायज्ञ असतात ते कशासाठी आहेत? सरकार ५ वर्ष चालणार असं म्हणता मग काळी जादू, बुवाबाजी कशाला करता?, पैसे, भ्रष्टाचार, बदल्यांसाठी, वसुलीवरुन या तिन्ही पक्षांमध्येच भांडणं आहे. हिंदुत्व बस्तानात टाकलं आहे. केवळ हिरवे कपडे घालणंच बाकी आहे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

आमदार नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले की, हिंदु सण, हिंदु मंदिरं नको अशी परिस्थिती राज्यात ठाकरे सरकारने केलीय. महाराष्ट्रात हिंदु खतरे मे है असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईतला हिंदु कसा संपेल असा किमान समान कार्यक्रम महाविकास आघाडीकडून चालवला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीमुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. मालवणीत हिंदुंना अक्षरश: पळवलं जातंय. हिंदु मुलींना टार्गेट केलं जातंय. सेक्युलरच्या नावाखाली शिवसेनेने बाळासाहेबांचे हिंदुत्व बाजूला सारलंय. ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले.

"राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट

तसेच नारायण राणे(Narayan Rane) यांचा अनुभव आहे. मुंबईच्या राजकारणाबद्दल त्यांना प्रचंड अनुभव आहे. हा नेता आशिष शेलार, लोढा यांच्या सगळ्यांसोबत उभा राहिला. तर गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत जी सत्ता आहे. बेजबाबदार कारभार सुरु आहे. त्याला चांगला पर्याय देता येईल. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली तर भाजपासाठी सोप्प जाईल. बाळासाहेबांची शिवसेना कुणी संपवली असेल तर ती ही नाईट लाइफ वाल्यांनी संपवली आहे. मग प्रचारात दिनो मोरिया, दिशा पटानी दिसतील आणि जुने शिवसैनिक मागेच राहतील असं नितेश राणे यांनी सांगितले.  

राणे कुटुंबासाठी तो भावनिक क्षण

नारायण राणेंसोबत जो प्रवास आईनं बघितला आहे. चढउतार बघितले आहेत त्यामुळे आईकडून खूप काही शिकायला मिळतं. काही विषय आई इतक्या सहजपणे आम्हाला सांगते, आईला ज्या गोष्टी राजकारणाबद्दल कळतात आम्हाला आश्चर्य वाटतं. आमच्या घरावर जो हल्ला करण्यात आला तो राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण होता. जर तुम्हाला यायचं होतं तर तारीख सांगून यायचं होतं. आम्ही नसताना तिथे आला. परंतु आमचे कार्यकर्ते आमच्या घराचं संरक्षण करण्यात समर्थ होते. आमच्या घरात लहान मुलं होतं. जो काही धिंगाणा घातला ही मानसिकता ठाकरे कुटुंबाने दाखवली त्याचा आईला त्रास झाला असं नितेश राणे म्हणाले.

‘तो’ राणे कुटुंबासाठी भावनिक क्षण; आई-वडिलांबाबत बोलताना आमदार नितेश राणे भावूक

तसेच आपल्या देशाचा अपमान होत असताना भारतीय नागरिक गप्प बसतील का? एका मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव की हिरक महोत्सव विचारावं याविरोधात तो संताप आहे. आमच्या घरावर जी मुलं पाठवली. आम्ही कुणीही नव्हतो तेव्हा ते सगळे घरावर आहे. पण आता ती वैयक्तिक लढाई त्यांनी केली. आमच्या घरात मुलं होतं. उद्या जर काही झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? आमच्या वडिलांना शिव्या घालताना आम्ही विरोध करायचा नाही का? मग तुम्ही जी भाषा वापरता ती आम्ही वापरली तर ते चालत नाही. सुरुवात त्यांनी केली पण आता व्याजासह प्रत्युत्तर आम्ही देऊ असा इशाराही नितेश राणेंनी दिला.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्वUddhav Thackerayउद्धव ठाकरे