शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

समन्यायी पाणीवाटप

By admin | Updated: October 20, 2015 01:29 IST

मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी

मुंबई : मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी पाणीवाटपाच्या सूत्रानुसार पाणी सोडणे बंधनकारक असून कुठल्याही परिस्थितीत ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी दिली.गेल्या वर्षीही दुष्काळामुळे मराठवाड्यासाठी ७.११ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यापैकी ४.७९ टीएमसी पाणी पोहोचले होते. यंदा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. पैठण धरणात १५ आॅक्टोबरला पाणीसाठा १२९ द.ल.घ.मी. असून खरीप हंगामातील पाणीवापर १८७ द.ल.घ.मी. एवढा आहे. एकूण उपलब्ध पाणी ३१६ द.ल.घ.मी. आहे. त्याची संकल्पित पाणीसाठ्याशी १४.५५ एवढी टक्केवारी आहे. ही टक्केवारी ३७पेक्षा कमी असल्याने समन्यायी पाणीवाटपासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.१२.८४ टीएमसी पैठण धरणात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निवाड्यानुसार पैठण धरणाच्या उर्ध्व भागातील मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी दारणा आणि पालखेड या धरणसमूहातील १२.८४ टीएमसी पाणी पैठण धरणात सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.