शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

‘एल्गार’चा तपास एनआयएमार्फतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:32 IST

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय : राष्ट्रवादीचे म्हणणे अमान्य; कोरेगाव-भीमा तपास पोलिसांकडेच

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र कोरेगाव-भीमा प्रकरणातील २२ गुन्ह्यांचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडेच राहील.

एल्गार परिषद प्रकरणाचा तपास एसआयटीद्वारे राज्य सरकारने करावा, असे पत्र राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित फाइलवर एसआयटी नेमण्याची शिफारस केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी ती अमान्य करून, हा तपास एनआयएकडे देण्यास संमती दिल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीच सांगितले.

कोरेगाव-भीमाची दंगल हे तात्कालिक राज्य सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून दिशाभूल करण्याचा तो डाव होता. त्यामुळे याची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. पण केंद्राने लगेचच तपास एनआयएकडे दिला. ठाकरे यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका करताना राज्य सरकारला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता. तसे झाले नाही, असे म्हटले होते.

राज्य सरकारची भूमिकाराज्य सरकारने एनआयएला कागदपत्रे न दिल्याने एनआयएची टीम न्यायालयात गेली. तिथे एनआयएने एल्गार परिषदेसंबंधीची सर्व कागदपत्रे मागितली होती. संबंधित गुन्हा स्थानिक न्यायालयाच्या कक्षेत घडला असून, आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे देणे योग्य व कायदेशीर होणार नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे होते.

प्रश्न आता मिटला - अनिल देशमुखयामुळे शिवसेना व राष्टÑवादी या पक्षांत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अनिल देशमुख म्हणाले, केंद्राने राज्य सरकारला विश्वासात घ्यावे, असे आमचे म्हणणे होते. मुख्यमंत्र्यांनी एनआयएला मंजुरी दिल्याने प्रश्न मिटला आहे.

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliceपोलिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाNCPराष्ट्रवादी काँग्रेस