शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'ईडी'ची नोटीस : ग्रामीण महाराष्ट्रातून वाढतोय पवारांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:07 IST

महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून केवळ नेत्यांच्या गळतीमुळे चर्चेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक महिनाभरावर असताना चर्चेत आला आहे. ज्या सक्तवसुली संचलनालयाचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी करण्यात येतो, त्याच ईडीमुळे राष्ट्रवादीला नवसंजीवणी मिळते की, काय असं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होण्यास सुरू झालं की, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तब्बल 30 हून अधिक नेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. तर अजित पवार यांच्यावर चौकशीची टाच आहे. अशा स्थितीत शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी घराबाहेर निघाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी पवार पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सभांना राज्यात प्रतिसादही चांगला मिळत आहे.

दरम्यान सर्वकाही सुरळीत सुरू असताना शिखर बँकेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने पवारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. उलट ईडीची नोटीस पवारांविषयी आणखी सहानुभूती निर्माण करणारी ठरत आहे. त्यातच पवारांनी ईडीच्या नोटीसनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण खुद्द पाहुणचार घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पुन्हा एकदा इशारा दिला. महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातूनही पवारांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईडीची नोटीस पवारांना आली असली तरी त्याचा लाभ राष्ट्रवादीलाच अधिक होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

अतिवृष्टी झाली की पवार, भूकंप झाला की, पवार महापूर आला की पवार, दुष्काळ पडला की पवार असं राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनच चित्रच आहे. महाराष्ट्रात काहीही झालं तरी सर्वात आधी पवार तिथं पोहोचतात. त्याच्यावर सुडाचे राजकारण  करणे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील अस्मितेला धक्का आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल.शैलेश देशमुख, युवा कार्यकर्ते, चिखली.