शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत भारतीय IT कर्मचाऱ्यांसाठी 'टेन्शन'! H-1B व्हिसा मिळणं ७०% नी घटलं; TCS चाही रिजेक्शन रेट वाढला!
2
Nanded Murder Case : "तुझ्या बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मारुन ये....", सक्षमला मारण्याआधी पोलीस चौकीतील घटनाक्रम; आंचलने सांगितली धक्कादायक माहिती
3
एका झटक्यात चांदीची किंमत ९३८१ रुपयांनी वाढली, सोन्यातही जोरदार वाढ; पाहा नवे दर
4
श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
5
पाक लष्कराचा 'बॉस' कोण? COAS मुनीर यांचा कार्यकाळ संपला, पण CDFचे पद रिकामेच! नेमका अडसर कशाचा?
6
संजय राऊत पुन्हा मैदानात, एकनाथ शिंदेंवर घणाघात! म्हणाले, "डिसेंबरनंतर काय होतं पाहा, शिंदेसेनेचा कोथळा..."
7
"पराभवाच्या निराशेतून बाहेर पडा", हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका
8
नेव्ही ऑफिसरच्या भूमिकेत दिलजीत दोसांझ, 'बॉर्डर २'मधून अभिनेत्याचा पहिला व्हिडीओ आउट
9
चुकीच्या वेळी दूध प्यायल्याने मुलांच्या वाढीवर परिणाम? सकाळ की संध्याकाळ... 'ही' आहे सर्वोत्तम वेळ
10
लग्नासाठी ऑनलाइन वधू शोधत होता अन् लागला ४९ लाखांचा चुना; पीचडी करण्याऱ्या तरुणासोबत काय घडलं?
11
स्वस्त झाला सिलिंडर; आजपासून किती रुपयांना मिळणार, पाहा ATF च्या किंमतीत किती झाला बदल?
12
भारतीय युवकानं नाकारली ६७ लाखांची जॉब ऑफर; 'वर्क फ्रॉम होम'पासून का काढतायेत पळ? समोर आलं कारण
13
Ajit Pawar: जाहीर सभेत अजित पवारांचा 'मुख्यमंत्री' म्हणून उल्लेख; दादा गालातल्या गालात हसले आणि म्हणाले...
14
काळीज हेलावणारी घटना! ७ वर्षांच्या लेकाला वाचवण्यासाठी धावली, आणि भरधाव बसने आईला चिरडले; तीन लेकरांसमोर मातेचा मृत्यू
15
वैभव सूर्यवंशीचा टीम इंडियात धमाका; बिहारमध्ये गेल्यावर बॅटला लागलं 'ग्रहण'
16
खळबळजनक! 'तो' वाद टोकाला गेला, लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशीच विवाहितेसोबत घडलं भयंकर
17
नोकरी करणं गरज नाही तर केवळ छंद राहिल; Nikhil Kamath यांच्या पॉडकॉस्ट मध्ये Elon Musk यांची भविष्यवाणी
18
'तुम्ही चर्चा करत नाही, तो ड्रामा'; हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
19
SIP ला लावा 'टॉप-अप'चा बुस्टर! दरवर्षी रक्कम वाढवा आणि तुमचं आर्थिक लक्ष्य वेळेआधी पूर्ण करा!
20
अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक, समायोजन स्थगित; आता २०२५-२६ च्या संचमान्यतेनंतरच प्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'ईडी'ची नोटीस : ग्रामीण महाराष्ट्रातून वाढतोय पवारांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:07 IST

महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून केवळ नेत्यांच्या गळतीमुळे चर्चेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक महिनाभरावर असताना चर्चेत आला आहे. ज्या सक्तवसुली संचलनालयाचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी करण्यात येतो, त्याच ईडीमुळे राष्ट्रवादीला नवसंजीवणी मिळते की, काय असं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होण्यास सुरू झालं की, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तब्बल 30 हून अधिक नेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. तर अजित पवार यांच्यावर चौकशीची टाच आहे. अशा स्थितीत शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी घराबाहेर निघाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी पवार पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सभांना राज्यात प्रतिसादही चांगला मिळत आहे.

दरम्यान सर्वकाही सुरळीत सुरू असताना शिखर बँकेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने पवारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. उलट ईडीची नोटीस पवारांविषयी आणखी सहानुभूती निर्माण करणारी ठरत आहे. त्यातच पवारांनी ईडीच्या नोटीसनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण खुद्द पाहुणचार घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पुन्हा एकदा इशारा दिला. महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातूनही पवारांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईडीची नोटीस पवारांना आली असली तरी त्याचा लाभ राष्ट्रवादीलाच अधिक होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

अतिवृष्टी झाली की पवार, भूकंप झाला की, पवार महापूर आला की पवार, दुष्काळ पडला की पवार असं राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनच चित्रच आहे. महाराष्ट्रात काहीही झालं तरी सर्वात आधी पवार तिथं पोहोचतात. त्याच्यावर सुडाचे राजकारण  करणे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील अस्मितेला धक्का आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल.शैलेश देशमुख, युवा कार्यकर्ते, चिखली.