शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

'ईडी'ची नोटीस : ग्रामीण महाराष्ट्रातून वाढतोय पवारांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:07 IST

महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून केवळ नेत्यांच्या गळतीमुळे चर्चेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक महिनाभरावर असताना चर्चेत आला आहे. ज्या सक्तवसुली संचलनालयाचा वापर विरोधकांना घाबरविण्यासाठी करण्यात येतो, त्याच ईडीमुळे राष्ट्रवादीला नवसंजीवणी मिळते की, काय असं वातावरण महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होण्यास सुरू झालं की, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तब्बल 30 हून अधिक नेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता. तर अजित पवार यांच्यावर चौकशीची टाच आहे. अशा स्थितीत शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी घराबाहेर निघाले आहे. वयाच्या 78व्या वर्षी पवार पायाला भिंगरी लावून राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या सभांना राज्यात प्रतिसादही चांगला मिळत आहे.

दरम्यान सर्वकाही सुरळीत सुरू असताना शिखर बँकेत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ईडीने पवारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. उलट ईडीची नोटीस पवारांविषयी आणखी सहानुभूती निर्माण करणारी ठरत आहे. त्यातच पवारांनी ईडीच्या नोटीसनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण खुद्द पाहुणचार घेण्यासाठी ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पुन्हा एकदा इशारा दिला. महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे. ग्रामीण महाराष्ट्रातूनही पवारांना पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे ईडीची नोटीस पवारांना आली असली तरी त्याचा लाभ राष्ट्रवादीलाच अधिक होणार असं चित्र सध्या तरी दिसत आहे.

अतिवृष्टी झाली की पवार, भूकंप झाला की, पवार महापूर आला की पवार, दुष्काळ पडला की पवार असं राज्यातील गेल्या अनेक वर्षांपासूनच चित्रच आहे. महाराष्ट्रात काहीही झालं तरी सर्वात आधी पवार तिथं पोहोचतात. त्याच्यावर सुडाचे राजकारण  करणे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील अस्मितेला धक्का आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसेल.शैलेश देशमुख, युवा कार्यकर्ते, चिखली.