शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुसूत्रीकरणात एसटी आगारांवरही गदा

By admin | Updated: September 26, 2016 02:54 IST

ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे

मुंबई : ग्रामीण भाग शहरी भागाला जोडणाऱ्या एसटी महामंडळाने मोठ्या प्रमाणात सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. यातून अनेक लांब पल्ल्याच्या फेऱ्यांवर गदा आणली जात असून, त्याचा परिणाम प्रवाशांवर होत आहे. सुसूत्रीकरणातून लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी केल्या जात असतानाच, हळूहळू काही आगारांची संख्या कमी केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील आगारांचा आढावा घेतला जात असून, ३0 किलोमीटरच्या आत असणाऱ्या एकापेक्षा जास्त आगारांपैकी एक आगार बंद केले जाईल. यातून महामंडळाचा खर्च वाचविण्याचा प्रयत्न असला, तरी स्थानिकांना मात्र दुसऱ्या आगारात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आगार याप्रमाणे १९९0 सालापासून राज्यातील एसटी आगारांची संख्या हळूहळू वाढवण्यात आली. याप्रमाणे, महामंडळाचे राज्यात २५१ आगार आहेत. मात्र, आगारांची संख्या वाढत गेल्यावर मनुष्यबळही वाढत गेले आणि त्याबरोबर, देखभाल-दुरुस्तीसह अन्य खर्चही. त्यामुळे मोठ्या खर्चाला तोंड द्यावे लागले. त्यामुळे अनेक आगारही तोट्यात असल्याचे कारण पुढे करत, एसटी महामंडळाने फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने, अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे.लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद करून काही फेऱ्या एका आगारातून जवळच्याच आगारात वळत्या करून, टप्प्याटप्प्यात एकाच परिसरातील दोनपैकी एक आगार बंद करण्याचे नियोजन केले असल्याचे, एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सुसूत्रीकरणासंदर्भात एसटी महामंडळाच्या गेल्या काही दिवसांत बैठकाही झाल्या. या बैठकीत आगारांचा आढावा घेण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ३० किमी अंतरातील एकापेक्षा जास्त असणाऱ्या आगारांबरोबर १०० पेक्षा कमी फेऱ्या असणारी आगारे टप्प्याटप्प्याने बंद होतील. बंद होणाऱ्या आगारातील फेऱ्या व देखभाल-दुरुस्ती ही जवळच्याच आगारात हळूहळू वळती केली जाणार आहे.