शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाढत्या घटस्फोटामुळे ‘ पत्रिका’ बघण्याकडे सुशिक्षितांचा वाढतोय कल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 6:00 AM

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. का वाटते तरुणांना पत्रिका महत्वाची.. जाणून घ्या..!

ठळक मुद्देपुरोगामी म्हणविल्या जाणा-या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार

नम्रता फडणीस

पुणे : समाजातील घटस्फोटांचे वाढते प्रमाण पाहिल्यानंतर सुशिक्षित कुटुंबांना भविष्यात मुलामुलींची लग्न टिकतील की नाही याचीच आता धास्ती वाटू लागली आहे. मन जुळण्यासाठी दोघांचे गुण जुळणे आवश्यक असल्याने सुशिक्षित तरूण-तरूणींचा ओढा पत्रिका पाहण्याकडे वाढला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकविसाव्या शतकात लग्न ठरविताना तरूणी-तरूणी आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत की नाही हे पाहण्यापेक्षा पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात पत्रिकांचा अवैज्ञानिक आधार घेतला जातोय, मात्र यामुळे घट्स्फोट रोखले जातील का? असा एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

सध्या तरूण-तरूणींसाठी  ‘लग्न’ हा विषय अत्यंत गंभीर बनला आहे. पूर्वीच्या काळी लग्न जमविताना मुलगा-मुलगी एकमेकांना पाहण्याआधी त्यांची पत्रिका जुळते का? हे पाहिले जायचे. मध्यंतरीच्या काळात सुशिक्षित कुटुंबानी पत्रिका बघण्याच्या इतिकर्तव्याला काहीसा फाटा दिला होता. मात्र, आता पुन्हा पत्रिका बघण्याचा ‘ट्रेंड’ सुशिक्षित कुटुंबामध्ये जोर धरू लागला आहे. दोघांचे किती गुण जुळतायत? नाडी एक तर नाही ना? षडाष्टक योग तर नाही ना? अशा चर्चा कुटुंबांमध्ये ऐकायला मिळत आहेत. लग्न ठरविताना दोघांचे मनोमिलन होईल की नाही, त्यांच्यात भविष्यात वादविवाद तर होणार नाहीत ना? याचीच अनेक सुशिक्षित कुटुंबाना काळजी सतावू लागली आहे. समाजात वाढत असलेले घट्स्फोटाचे प्रमाण हे यामागचे प्रमुख कारण आहे . मुली नोकरीनिमित्त घराबाहेर पडल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आले आहे. त्यामुळे त्या कोणत्याही प्रकारे नव-याशी तडजोड करण्यास तयार नाहीत. त्यामुळे दोघांच्यातील वाद विकोपाला गेले की एका झटक्यात घटस्फोटाचा मार्ग दोघांपैकी एकाकडून स्वीकारला जात आहे. त्यामुळे भविष्यात ही घट्स्फोटाची जखम होऊ नये आणि ती लग्नाला मारक ठरू नये यासाठी सुशिक्षित कुटुंबांनी पत्रिकेचा आधार घेतला असल्याचे ज्योतिष अभ्यासकांकडून सांगितले जात आहे. मात्र पत्रिका बघूनही अनेकांचे घटस्फोट झाले आहेत अशी अनेक उदाहरणे आहेत. मग त्याचे काय? पत्रिका त्यांचे घटस्फोट का रोखू शकली नाही?असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उपस्थित  केला आहे. घटना 1 

दोघं एकमेकांना आवडली. मात्र दोघांच्या पत्रिका बघायच्या असा दोन्हीकडच्या कुटुंबियांचा अट्टहास होता. पत्रिका दाखविल्यानंतर मुलाचे आयुष्य अल्प आहे. तो फारकाळ जगणार नाही असे ज्योतिषांनी पत्रिका बघून सांगितले. त्यानंतर तो मुलगा सहा महिन्यातच वारला असल्याचे एका कुटुंबाकडून सांगण्यात आले. वाढत्या घटस्फोटांमुळे पत्रिका बघण्याकडे सुशिक्षितांचा ओढा वाढला हे खरं आहे. पूर्वीच्या काळी महिला जास्त शिकलेल्या नसायच्या. त्यामुळे त्या तडजोड करून लग्न टिकवायच्या. मात्र आता मुली स्वत: नोकरी करू लागल्या आहेत. त्यांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे. तडजोडपणाची वृत्ती राहिलेली नाही. हेच घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे लग्नाचा विचार करताना पत्रिका पाहून मन जुळतील की नाही? मतभेद तर होणार नाहीत ना? हे जाणून घेण्यासाठी पत्रिका पाहण्यावर जोर दिला जात आहे- चंद्रकांत शेवाळे, प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ

लग्न जुळविताना पत्रिकेच्या माध्यमातून किमान मुलभूत गोष्टी पाहायल्या हव्यात या मताचा मी आहे. त्यामध्ये दोघांची नाडी एकच नाही ना? गुण किती जुळतात? किमान 18 गुण जुळतात का? हे पाहिले गेले पाहिजे. मुलीच्या पत्रिकेत कोणता प्रॉब्लेम नाही ना? ज्याने भविष्यात कोणत्या अडचणी येतील. हे पाहायला हवे. काही थोड्याफार तडजोडी या कराव्याच लागतात. पण घटस्फोटापर्यंत गोष्टी जाणार नाहीत ना? हे किमान जाणून घ्यायला हवं- सूरज पानसे, तरूण.......................

मुळात ज्यांचा घटस्फोट झालाय त्यांनी पत्रिका पाहिल्या होत्या का ? याचे सवर््हेक्षण करायला हवे. पत्रिका पाहिल्यानंतरही अनेक जोडप्यांचे घटस्फोट झाल्याची  अनेक उदाहरणे आहेत. पत्रिकेपेक्षाही स्वभाव जुळणे आवश्यक आहे. दोघेही आरोग्यदृष्ट्या सुदृढ आहेत का नाही? हे पाहायला हवे. लग्न जुळविताना पत्रिका पाहाणे हे पूर्णत: अवैज्ञानिक आहे-  डॉ. मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेmarriageलग्न