शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाचे सावट?, केंद्राचा प्राथमिक अंदाज : १७ राज्यांचे २२५ जिल्हे प्रभावित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:57 IST

यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.केंद्र सकारच्या ‘नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर अँड ड्रॉट अ‍ॅसेसमेंट सीस्टिम’ने वर्तविलेल्या या अंदाजानुसार काही महिन्यांपूर्वी ज्यांनी कृषिकर्ज माफीची घोषणा केली, त्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पंजाब या तीन राज्यांतील शेतीखालील मोठ्या क्षेत्रांचाही समावेश आहे. हा अंदाज खरा ठरला, तर आधीच अडचणीत असलेली तेथील शेतीच्या क्षेत्रावर आणखी ताण येईल. तज्ज्ञांच्या मते या राज्यांच्या सरकारांना जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी निधीची जुळवाजुळव करताना, मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच खरीप पिके हातची गेली,े तर नव्या अडचणी येतील.या यंत्रणेमार्फत दरमहा तयार केला जाणारा अहवाल दिल्लीतील ‘नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर’ (एनसीएफसी)तर्फे जाहीर केला जातो. या सेंटरचे संचालक एस. एस. रे यांनी सांगितले की, आॅगस्टअखेरच्या पाऊसपाण्यानुसार ज्यांच्या बाबतीत दुष्काळाचे पहिले संकेत दिले गेले, (ट्रिगर १) अशा जिल्ह्यांची संख्या २२५ होती. यात महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश होता.या आधी आॅगस्टमध्ये जो जुलैचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात दुष्काळाची प्राथमिक शक्यता वर्तविलेल्या जिल्ह्यांची संख्या १०४ होती. महिनाभरात ही संख्या दुप्पट झाल्याचे दिसते.सरकारी पाऊस बरा झाला असला, तरी मध्यंतरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने, खरिपाच्या पिकांची हानी होण्याची शक्यता आहे. आॅगस्टअखेरचा अहवाल येत्या काही दिवसांत अधिकृतपणे जाहीर होणे अपेक्षित आहे.हा अहवाल आला असला, तरी त्यात उल्लेख केलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दुष्काळ पडेलच असे नाही. याचे कारण असे की, दुष्काळ अधिकृतपणे जाहीर करण्याच्या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेतील ‘ट्रिगर १’ हा पहिला टप्पा आहे.तरीही तो महत्त्वाचा आहे. कारण हा अंदाज पावसाची तूट व मध्ये गेलेले कोरडे दिवस यावर आधारलेला आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पैसेवारी करणे व एकूणच पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे हे या पुढील दोन टप्पे आहेत.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार