शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा, विदर्भावर दुष्काळाचे सावट?, केंद्राचा प्राथमिक अंदाज : १७ राज्यांचे २२५ जिल्हे प्रभावित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:57 IST

यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : यंदाचा नैऋत्य मान्सूनचा हंगाम आणखी तीन आठवड्यांत संपण्याच्या बेतात असताना, शेतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा महाराष्ट्रासह देशातील १७ राज्यांमधील २२५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे.केंद्र सकारच्या ‘नॅशनल अ‍ॅग्रीकल्चर अँड ड्रॉट अ‍ॅसेसमेंट सीस्टिम’ने वर्तविलेल्या या अंदाजानुसार काही महिन्यांपूर्वी ज्यांनी कृषिकर्ज माफीची घोषणा केली, त्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पंजाब या तीन राज्यांतील शेतीखालील मोठ्या क्षेत्रांचाही समावेश आहे. हा अंदाज खरा ठरला, तर आधीच अडचणीत असलेली तेथील शेतीच्या क्षेत्रावर आणखी ताण येईल. तज्ज्ञांच्या मते या राज्यांच्या सरकारांना जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी निधीची जुळवाजुळव करताना, मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच खरीप पिके हातची गेली,े तर नव्या अडचणी येतील.या यंत्रणेमार्फत दरमहा तयार केला जाणारा अहवाल दिल्लीतील ‘नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटर’ (एनसीएफसी)तर्फे जाहीर केला जातो. या सेंटरचे संचालक एस. एस. रे यांनी सांगितले की, आॅगस्टअखेरच्या पाऊसपाण्यानुसार ज्यांच्या बाबतीत दुष्काळाचे पहिले संकेत दिले गेले, (ट्रिगर १) अशा जिल्ह्यांची संख्या २२५ होती. यात महाराष्ट्रातील मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांचाही समावेश होता.या आधी आॅगस्टमध्ये जो जुलैचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यात दुष्काळाची प्राथमिक शक्यता वर्तविलेल्या जिल्ह्यांची संख्या १०४ होती. महिनाभरात ही संख्या दुप्पट झाल्याचे दिसते.सरकारी पाऊस बरा झाला असला, तरी मध्यंतरी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने, खरिपाच्या पिकांची हानी होण्याची शक्यता आहे. आॅगस्टअखेरचा अहवाल येत्या काही दिवसांत अधिकृतपणे जाहीर होणे अपेक्षित आहे.हा अहवाल आला असला, तरी त्यात उल्लेख केलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष दुष्काळ पडेलच असे नाही. याचे कारण असे की, दुष्काळ अधिकृतपणे जाहीर करण्याच्या तीन टप्प्यांच्या प्रक्रियेतील ‘ट्रिगर १’ हा पहिला टप्पा आहे.तरीही तो महत्त्वाचा आहे. कारण हा अंदाज पावसाची तूट व मध्ये गेलेले कोरडे दिवस यावर आधारलेला आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पैसेवारी करणे व एकूणच पाण्याच्या उपलब्धतेचा अंदाज घेणे हे या पुढील दोन टप्पे आहेत.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार