शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

‘किसान सन्मान’ योजनेतून डॉक्टर, वकील, इंजिनीअर बाद, ६००० रुपये साहाय्याचे निकष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 4:49 AM

दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

- गजानन मोहोडअमरावती - दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत दरवर्षी तीन टप्प्यांत सहा हजारांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. याबबतचे निकष राज्य शासनाने मंगळवारी जारी केले. यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सनदी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ व ज्यांनी गतवर्षी प्राप्तिकर भरला त्या व्यक्ती अपात्र ठरणार आहेत.दरम्यान, मंगळवारी राज्याचे मुख्य सचिवांनी व्हिसीद्वारे सर्व जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला व योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत शासनाने कालबद्ध कार्यक्रम दिलेला असून, २६ फेब्रुवारीच्या आत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्ह्यांना दिले.योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली सीईओ, एसएओ, आरडीसी, डीडीआर, एलडीएम व डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्टची समिती राहील. तालुकास्तरावर एसडीओंच्या अध्यक्षतेखाली एसडीओ (कृषी) तहसीलदार, बीडीओ, एआर यांची समिती, तर गावस्तरावर तलाठ्याच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, कृषी सहायक तसेच विकास सोसायटींचे सचिवांची समिती अंमलबजावणी करेल. योजनेसाठी शेतकºयांचा आधार, मोबाइल व बँक खाते क्रमांक अचूक असणे महत्त्वाचे आहे. ही माहिती संकलित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असणार आहे.चतुर्थ श्रेणी कर्मचारी सोडून सर्व अपात्रकेंद्राच्या या मदतीसाठी संवैधानिक पदधारणा केलेले आजी-माजी व्यक्ती, आजी-माजी लोकसभा व राज्यसभेचे खासदार, आजी-माजी मंत्री, आमदार, महापौर, आजी-माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अपात्र आहेत. केंद्र व राज्य शासन तसेच अंगीकृत निमशासकीय संस्थांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे चतुर्र्थश्रेणी कर्मचारी सोडून सर्व अधिकारी व कर्मचारी अपात्र राहणार आहेत. ज्यांना निवृत्तीवेतन दहा हजारांपेक्षा कमी आहे, अशी व्यक्ती लाभार्थी राहतील.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी