शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून आमदारांना बोलू देत नाही; हरिभाऊ बागडे यांची मिस्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 03:20 IST

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काम हे बोलण्याचे नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्र्याकडून काम करून घेण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : आपण विधानसभेत आमदारांना फारसे बोलू देत नाही. कारण सभागृहात बोलायला उभे राहिले तर माध्यमांमध्ये छायाचित्र छापून येते, असे आमदारांना वाटते, अशी मिस्कील टिप्पणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काम हे बोलण्याचे नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्र्याकडून काम करून घेण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मुक्तछंदतर्फे आयोजित ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. या वेळी दहशतवादविरोधी यंत्रणेचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील ‘क्रॉस आॅर्डर आॅफ मेरिट’ पुरस्कार पटकावणारे डॉ. अरविंद नातू, किल्लारी भूकंपातून बचावलेली प्रिया जवळगे, बचाव पथकप्रमुख लेफ्टनंट कर्नल सुमीत बक्षी, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांना स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.बागडे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह त्या काळात प्रमोद महाजन यांच्या भाषणांचेही तितकेच आकर्षण असायचे. १९८५ मध्ये शिवसेना- भाजप युती करण्यासाठी महाजन यांनी जिल्हावार दौरा केला आणि शेवटी युती यशस्वी करून दाखविली. कितीही तणाव आले तरी त्यातून मार्ग काढायचा ही त्यांची वृत्ती होती. आज महाजन असते तर राजकारणाला चांगली दिशा मिळाली असती. गिरीश बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमोद महाजन यांच्या विचारांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, ‘पोलीस सेवेत असल्याने पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी घ्यावी लागते. मेधा कुलकर्णी यांनी ती एका दिवसात मिळवली. रोख रकमेशिवाय पुरस्कार स्वीकारा, असे पत्र मला वरिष्ठांकडून मिळाले. तसंही मी माझ्या आयुष्यात पगार सोडून ‘रोख रक्कम’ कधीच स्वीकारली नाही.’बक्षी म्हणाले, की समाजोपयोगी संशोधन ही गरज आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन महत्त्वाचे असून, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचे मत अरविंद नातू यांनी व्यक्त केले. मानवता हा धर्म सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. माणुसकीच्या नात्याने कर्म केले पाहिजे.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा