शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

...म्हणून आमदारांना बोलू देत नाही; हरिभाऊ बागडे यांची मिस्कील टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 03:20 IST

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काम हे बोलण्याचे नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्र्याकडून काम करून घेण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुणे : आपण विधानसभेत आमदारांना फारसे बोलू देत नाही. कारण सभागृहात बोलायला उभे राहिले तर माध्यमांमध्ये छायाचित्र छापून येते, असे आमदारांना वाटते, अशी मिस्कील टिप्पणी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे काम हे बोलण्याचे नाही तर मंत्रालयात जाऊन आपल्या मंत्र्याकडून काम करून घेण्याचे आहे, असेही त्यांनी सांगितले.स्व. प्रमोद महाजन यांच्या जयंतीचे औचित्य साधून आमदार मेधा कुलकर्णी यांच्या मुक्तछंदतर्फे आयोजित ‘स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. या वेळी दहशतवादविरोधी यंत्रणेचे अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील ‘क्रॉस आॅर्डर आॅफ मेरिट’ पुरस्कार पटकावणारे डॉ. अरविंद नातू, किल्लारी भूकंपातून बचावलेली प्रिया जवळगे, बचाव पथकप्रमुख लेफ्टनंट कर्नल सुमीत बक्षी, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांना स्व. प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.बागडे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह त्या काळात प्रमोद महाजन यांच्या भाषणांचेही तितकेच आकर्षण असायचे. १९८५ मध्ये शिवसेना- भाजप युती करण्यासाठी महाजन यांनी जिल्हावार दौरा केला आणि शेवटी युती यशस्वी करून दाखविली. कितीही तणाव आले तरी त्यातून मार्ग काढायचा ही त्यांची वृत्ती होती. आज महाजन असते तर राजकारणाला चांगली दिशा मिळाली असती. गिरीश बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमोद महाजन यांच्या विचारांचे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली.अतुलचंद्र कुलकर्णी म्हणाले, ‘पोलीस सेवेत असल्याने पुरस्कार स्वीकारण्याची परवानगी घ्यावी लागते. मेधा कुलकर्णी यांनी ती एका दिवसात मिळवली. रोख रकमेशिवाय पुरस्कार स्वीकारा, असे पत्र मला वरिष्ठांकडून मिळाले. तसंही मी माझ्या आयुष्यात पगार सोडून ‘रोख रक्कम’ कधीच स्वीकारली नाही.’बक्षी म्हणाले, की समाजोपयोगी संशोधन ही गरज आहे. ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेसाठी संशोधन महत्त्वाचे असून, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचे मत अरविंद नातू यांनी व्यक्त केले. मानवता हा धर्म सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ आहे. माणुसकीच्या नात्याने कर्म केले पाहिजे.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेMLAआमदारMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा