शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दुष्काळाबाबत टाळाटाळ नको; अन्यथा आदेश देऊ, राज्य सरकारला कोर्टाने खडसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 05:52 IST

केवळ विदर्भ व मराठवाडाच नव्हे, तर अन्य भागांतही दुष्काळाची स्थिती भीषण आहे.

मुंबई : मराठवाडा व विदर्भामध्ये पाण्याची पातळी जवळपास शून्य टक्क्यावर गेली आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर आहे आणि अशा स्थितीत त्याबाबत माहिती द्यायला सरकारचे विशेष वकील उपस्थित नाहीत, ही सबब देऊन टाळाटाळ करू नका. पुढच्या सोमवारी वकिलांना हजर करा; अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ, अशी तंबीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दुष्काळासंदर्भात आखलेल्या मागदर्शक तत्त्वांची व दुष्काळ संहितेत नमूद केलेल्या सर्व उपाययोजना राज्य सरकारने आखाव्यात आणि दुष्काळ संहितेनुसार बंधनकारक असलेला दुष्काळ नियंत्रण कक्ष उभारण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती मराठवाड्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी नोटीस आॅफ मोशनद्वारे केली आहे.राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला असताना, राज्य सरकारने कायद्याला अनुसरून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या नसल्याने, संजय लाखे-पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयापुढे नोटीस आॅफ मोशन दाखल केले. न्या. अजय गडकरी व न्या. एन. एम. जमादार यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.

या प्रकरणी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांची विशेष वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारच्या सुनावणीत साखरे अनुपस्थित असल्याने उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच खडसावले. मराठवाडा व विदर्भ या भागांत पाण्याची पातळी शून्य टक्के आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील दुष्काळी भागातील स्थिती भीषण आहे. अशा स्थितीत विशेष वकील उपस्थित नाहीत, अशी सबब देऊन टाळाटाळ करू नका. ते उपस्थित नसतील, तर त्यांच्याकडून ही केस काढून घ्या. पुढील सोमवारी वकिलांना हजर करा; अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ, अशी तंबी न्यायालयाने राज्य सरकारला दिली.पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाईकेवळ विदर्भ व मराठवाडाच नव्हे, तर अन्य भागांतही दुष्काळाची स्थिती भीषण आहे. पाण्याचे दुर्भिक्ष, जनावरांच्या चाºयाची टंचाई, सर्वत्र सुरू नसलेल्या चारा छावण्या, चाºयाचे वाढलेले भाव यांमुळे ग्रामीण भागातील लोक हैराण आहेत. त्यामुळे न्यायालयात काय होणार व तेथून काही आदेश सरकारला दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्रCourtन्यायालय