शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:03 IST

पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रचारात कुटुंबावर टिकागुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी विकासाच्या मुद्यांवर बोलत होते.मात्र,आता देशासह महाराष्ट्रात निवडणूक काळात घेतल्या जात असलेल्या प्रचारसभांमध्ये गांधी आणि पवार कुटुंबावर बोलत आहेत.पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या मुद्याला बगल दिली जात आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली.शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पवार बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षप्रदिप कंद,काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून बेरोजगारी,महागाई,जीएसटी शेतक-यांचे प्रश्न याबाबत अनेक आश्वासने देण्यात आली होती. वाढलेली महागाई शंभर दिवसात कमी होईल,असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु,गॅस सिलेंडर, पेट्रोलचे दर वाढलेले असून नागरिकांना जीएसटी त्रास होत आहे. नोटबंदीनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होतील, असे भाजपकडून सांगितले जात होते. परंतु,सध्या कुठेही ऑनलाइन व्यवहार होताना दिसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते या मुद्यांवर भाष्य करत नाही.परंतु,सत्ताधा-यांनी या पूर्वी दिलेल्या आश्वानाबाबत मतदार जागृत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा झाली. सभेच्या तंत्रात ठाकरे यांनी बदल केला असून राजकीय नेत्यांनी केलेली पूर्वीची आणि नंतरची वक्तव्य मोठ्या स्किनवर दाखविली जात आहेत. ठाकरे यांनी केलेली टिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलीच लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांना ठाकरे यांच्या सभेवर भाष्य करावे लागले.-------------खेड तालुक्यात विमानतळ होऊ शकले नाही.त्यामुळे हजारो बेरोजगारांचा रोजगार गेला.पुणे -नाशिक महामागार्चे काम पूर्ण होऊ शकले नाही.पुणे- अहमदनगर महामार्गावर एकही ट्रोमा सेंटर सुरू झाले नाही,अशी अनेक विकास कामे शिरूर लोकसभा मतदार संघात अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेनेचे ही निवडणूक हातात घेतली आहे.-डॉ.अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर लोकसभा  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक