शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोदींकडून विकासाच्या मुद्याला बगल : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 20:03 IST

पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.

ठळक मुद्देआश्वासनांची पूर्तता न झाल्याने प्रचारात कुटुंबावर टिकागुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वी विकासाच्या मुद्यांवर बोलत होते.मात्र,आता देशासह महाराष्ट्रात निवडणूक काळात घेतल्या जात असलेल्या प्रचारसभांमध्ये गांधी आणि पवार कुटुंबावर बोलत आहेत.पंडित नेहरू यांच्यापासून मनमोहन सिंग यांच्यापर्यंत एकाही पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राजकारणातील कुटुंबावर वक्तव्य केले नाही.गेल्या पाच वर्षात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांच्याकडून विकासाच्या मुद्याला बगल दिली जात आहे,अशी टीका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी केली.शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी पवार बोलत होते.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँगेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्षप्रदिप कंद,काँग्रेसचे नेते बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून बेरोजगारी,महागाई,जीएसटी शेतक-यांचे प्रश्न याबाबत अनेक आश्वासने देण्यात आली होती. वाढलेली महागाई शंभर दिवसात कमी होईल,असे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केले होते.परंतु,गॅस सिलेंडर, पेट्रोलचे दर वाढलेले असून नागरिकांना जीएसटी त्रास होत आहे. नोटबंदीनंतर सर्व व्यवहार ऑनलाइन होतील, असे भाजपकडून सांगितले जात होते. परंतु,सध्या कुठेही ऑनलाइन व्यवहार होताना दिसत नाहीत. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते या मुद्यांवर भाष्य करत नाही.परंतु,सत्ताधा-यांनी या पूर्वी दिलेल्या आश्वानाबाबत मतदार जागृत आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या सभेबाबत राजकीय क्षेत्रात विविध स्तरावर चर्चा झाली. सभेच्या तंत्रात ठाकरे यांनी बदल केला असून राजकीय नेत्यांनी केलेली पूर्वीची आणि नंतरची वक्तव्य मोठ्या स्किनवर दाखविली जात आहेत. ठाकरे यांनी केलेली टिका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना चांगलीच लागली. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे यांना ठाकरे यांच्या सभेवर भाष्य करावे लागले.-------------खेड तालुक्यात विमानतळ होऊ शकले नाही.त्यामुळे हजारो बेरोजगारांचा रोजगार गेला.पुणे -नाशिक महामागार्चे काम पूर्ण होऊ शकले नाही.पुणे- अहमदनगर महामार्गावर एकही ट्रोमा सेंटर सुरू झाले नाही,अशी अनेक विकास कामे शिरूर लोकसभा मतदार संघात अद्याप पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे जनतेनेचे ही निवडणूक हातात घेतली आहे.-डॉ.अमोल कोल्हे, उमेदवार, शिरूर लोकसभा  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRaj Thackerayराज ठाकरेmaval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक