शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अपंग विकास महामंडळात १0 वर्षापासून एकही कर्मचारी नाही!

By admin | Updated: October 15, 2015 02:00 IST

ओबीसी महामंडळाच्या कर्मचा-यांकडे अतिरिक्त कार्यभार ११ वर्षात ४९३ लाभार्थींंना कर्जवाटप.

सुनील काकडे/वाशिम : अपंगांच्या आर्थिक उन्नतीसाठी २00१ साली महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ स्थापन झाले; मात्र २00५-0६ पासून महामंडळातील जिल्हास्तरावर असलेल्या कार्यालयांमध्ये एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. ओबीसी महामंडळातील कर्मचार्‍यांवरच अपंगांच्या कल्याणाचाही भार टाकण्यात आल्याने दोन्हीही महामंडळांचे कामकाज थंडावले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या उद्देशाने ३ डिसेंबर २00१ रोजी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार, अपंग बांधवांना पारदर्शक व तत्पर सेवा मिळणे अपेक्षित होते; मात्र प्रारंभीपासूनच मूळ उद्देशांपासून भरकटलेल्या या महामंडळाने २00५-0६ पासून सर्वच जिल्ह्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करणे बंद केल्यामुळे अपंगांना अपेक्षित मार्गदर्शन अथवा आपल्या अडचणी मांडण्याकरिता जागाच शिल्लक राहिली नाही. १0 वर्षांंपासून सर्व जिल्ह्यांमधील ओबीसी महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे अपंग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. हे अधिकारी दोन्ही महामंडळातील कामाला योग्य न्याय देण्यास असर्मथ ठरले असून कामाच्या, वाढत्या व्यापाने ते पार वैतागले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे दोन्ही महामंडळं अल्पावधीतच पूर्णत: बंद पडतात की काय, अशी भिती वर्तविली जात आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातील कर्जवाटपाच्या किचकट प्रक्रियेमुळे गेल्या ११ वर्षात अमरावती विभागातील केवळ ४९३ अपंग लाभार्थींंना स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य मिळाले. त्यात अमरावती जिल्ह्यातील १८९ लाभार्थींंसह बुलडाणा जिल्ह्यातील १0४, यवतमाळ १0२; तर वाशिम जिल्ह्यातील ९८ लाभार्थींंचा समावेश आहे. यासंदर्भात अमरावती येथील ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्य अपंग वित्त व विकास महामंडळात सध्या एकही कार्यालयीन पद भरलेले नसल्याचे सांगीतले. यामुळे गेल्या अनेक वर्षांंपासून ही जबाबदारी ओबीसी महामंडळातील अधिकार्‍यांनाच पार पाडावी लागत आहे. अशाही स्थितीत वाशिम व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये काम चांगले करुन दाखविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगीतले.

*यवतमाळच्या अधिका-याकडे वाशिमचा कारभार

यवतमाळ येथील ओबीसी महामंडळाचे व्यवस्थापक मुकेश उमक यांच्याकडे सध्या वाशिमचाही कारभार सोपविण्यात आलेला आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील ओबीसी आणि अपंग विकास महामंडळाचे कामकाज पाहताना गत कित्येक वर्षांंपासून आजारी रजादेखील मिळाली नसल्याचे दु:ख उमक यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केले.