शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' विधेयकावर विधिमंडळाचा शिक्का; मुख्यमंत्री ठाकरेंचा फडणवीसांना दे धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:57 IST

थेट जनतेतून सरपंच निवडण्याची आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आणलेली पद्धत आता रद्द

मुंबई : सरपंचांची निवड ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून करण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंगळवारी मंजूर करण्यात आले. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच निवडण्याची आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आणलेली पद्धत आता रद्द करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने गेल्या महिन्यात याबाबतचा निर्णय घेऊन अध्यादेश काढण्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला होता. तथापि, विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर असताना अधिवेशनात विधेयक मांडून ते मंजूर करवून घ्यावे, असे राज्यपालांनी सांगितले होेते. त्यानुसार राज्य सरकारने मंगळवारी दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मांडले आणि विरोधकांचा गदारोळ सुरू असतानाच ते मंजूरही झाले. ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडून आलेल्या सरपंचांवर सुरुवातीला दोन वर्षांपर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही.

निवडणूक नवीन नियमाने येत्या २९ मार्चला राज्यातील १५७० ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. तीत थेट सरपंच निवडणूक होणार नाही, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असला तरी त्यात बदल करता येऊ शकतो. सरकारच्या कायद्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे आयोगातर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस