शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

मधुमेह दिन विशेष : दडपणामुळे तरुणाई लपवतेय आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:20 IST

ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे

स्नेहा मोरे 

मुंबई : ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे लपवितात. मुंबईसारख्या मेट्रो शहरात हे प्रमाण अधिक असून, सध्या अशा प्रकारचे अनेक रुग्ण दिसून येत असल्याचे मधुमेहतज्ज्ञांनी निरीक्षण केले आहे. बऱ्याचदा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मधुमेहाचे निदान झाल्यामुळे तरुणांना सामाजिक दडपण येते. मधुमेहामुळे करिअर, लग्न, मित्रपरिवाराकडून मिळणारी वागणूक अशा अनेक समस्यांमुळे तरुणांमध्ये हा न्यूनगंड दिसून येत आहे.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले की, २३ ते ३० वयोगटांतील अनेक तरुण-तरुणींना टाइप-१ मधुमेहाचे निदान होते. मात्र, ते मधुमेह झाल्याचे लपवितात. अनेकदा या मुलांचे पालक फाइल घेऊन त्यांची औषधे घेण्यासाठी क्लिनिकला येतात. अंधेरीत राहणाºया २७ वर्षांच्या तरुणीवर मधुमेहाचे उपचार सुरू आहेत. ती उच्चशिक्षित असून, एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे, पण मागील दोन वर्षांपासून एकदाही ती क्लिनिकला आलेली नाही. तिची आई मात्र, नित्यनेमाने तिच्या प्रकृतीची प्रगती कळवून औषधे घेऊन जाते. तिच्याप्रमाणेच, आणखी एका २८ वर्षांच्या तरुणाला साधारण ३-४ महिन्यांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले. मात्र, निदान झाल्यापासून राहत्या घराच्या परिसरातील क्लिनिकमध्ये पुन्हा येणार नाही, असे त्याने सांगितले. घर-कार्यालयापासून दूर असलेल्या दुसºया क्लिनिकमध्ये जाऊन तो उपचार घेत आहे. अशा रुग्णांच्या मनातील भीती, वाटणारी लाज घालविण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर त्यांचे समपुदेशन करतो. त्यांच्याशी संवाद साधून मधुमेह हा गंभीर आजार नाही, याचे दडपण घेऊन नका, वेळीच घर- मित्रपरिवारातील लोकांशी संवाद साधा, असा सल्लाही दिला जातो. मधुमेहाचे निदान झालेल्या तरुणाईला लग्न जुळताना समस्या येतात. कारण आजही मधुमेह हा आपल्या समाजात गंभीर आजार मानला जातो. मात्र, प्रतिबंधात्मक उपायांनी त्यावर नियंत्रण मिळविता येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, तसेच काही तरुण-तरुणींसाठी मधुमेह हा करिअरच्या टप्प्यातील अडथळा ठरतो.समुपदेशन गरजेचेमधुमेहतज्ज्ञ डॉ. मिहीर राऊत यांनी सांगितले की, तरुणाईतील सामाजिक दडपणामागे विशिष्ट कारणे आहेत. मधुमेहाची औषधे घेताना बºयाचदा जीवनशैली आणि आहारावर बंधने येतात. सद्यस्थितीत ही बंधने पाळणे तरुणाईला शक्य नसते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचा रोजचा दिनक्रम, सवयी बदलल्या आहेत. औषधोपचार करताना अनेक पथ्य पाळावी लागतात. सर्वच रुग्ण काटेकोरपणे याचे पालन करत नाहीत. शिवाय, केवळ मधुमेहच नव्हे, तर इतरही अनके आजारांबाबत तरुणाई हे दडपण बाळगून असते. अशा स्थितीत त्यांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, ही काळाची गरज आहे. 

टॅग्स :diabetesमधुमेहMumbaiमुंबईHealthआरोग्य