शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मधुमेह दिन विशेष : दडपणामुळे तरुणाई लपवतेय आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 02:20 IST

ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे

स्नेहा मोरे 

मुंबई : ऐन पंचविशीतील तरुण मुले-मुली अचानक मधुमेहाचे निदान झाल्यामुळे, सामाजिक दबावाखाली येऊन मधुमेह असल्याचे लपवितात. मुंबईसारख्या मेट्रो शहरात हे प्रमाण अधिक असून, सध्या अशा प्रकारचे अनेक रुग्ण दिसून येत असल्याचे मधुमेहतज्ज्ञांनी निरीक्षण केले आहे. बऱ्याचदा तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, मधुमेहाचे निदान झाल्यामुळे तरुणांना सामाजिक दडपण येते. मधुमेहामुळे करिअर, लग्न, मित्रपरिवाराकडून मिळणारी वागणूक अशा अनेक समस्यांमुळे तरुणांमध्ये हा न्यूनगंड दिसून येत आहे.

मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले की, २३ ते ३० वयोगटांतील अनेक तरुण-तरुणींना टाइप-१ मधुमेहाचे निदान होते. मात्र, ते मधुमेह झाल्याचे लपवितात. अनेकदा या मुलांचे पालक फाइल घेऊन त्यांची औषधे घेण्यासाठी क्लिनिकला येतात. अंधेरीत राहणाºया २७ वर्षांच्या तरुणीवर मधुमेहाचे उपचार सुरू आहेत. ती उच्चशिक्षित असून, एका नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे, पण मागील दोन वर्षांपासून एकदाही ती क्लिनिकला आलेली नाही. तिची आई मात्र, नित्यनेमाने तिच्या प्रकृतीची प्रगती कळवून औषधे घेऊन जाते. तिच्याप्रमाणेच, आणखी एका २८ वर्षांच्या तरुणाला साधारण ३-४ महिन्यांपूर्वी मधुमेहाचे निदान झाले. मात्र, निदान झाल्यापासून राहत्या घराच्या परिसरातील क्लिनिकमध्ये पुन्हा येणार नाही, असे त्याने सांगितले. घर-कार्यालयापासून दूर असलेल्या दुसºया क्लिनिकमध्ये जाऊन तो उपचार घेत आहे. अशा रुग्णांच्या मनातील भीती, वाटणारी लाज घालविण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर त्यांचे समपुदेशन करतो. त्यांच्याशी संवाद साधून मधुमेह हा गंभीर आजार नाही, याचे दडपण घेऊन नका, वेळीच घर- मित्रपरिवारातील लोकांशी संवाद साधा, असा सल्लाही दिला जातो. मधुमेहाचे निदान झालेल्या तरुणाईला लग्न जुळताना समस्या येतात. कारण आजही मधुमेह हा आपल्या समाजात गंभीर आजार मानला जातो. मात्र, प्रतिबंधात्मक उपायांनी त्यावर नियंत्रण मिळविता येते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, तसेच काही तरुण-तरुणींसाठी मधुमेह हा करिअरच्या टप्प्यातील अडथळा ठरतो.समुपदेशन गरजेचेमधुमेहतज्ज्ञ डॉ. मिहीर राऊत यांनी सांगितले की, तरुणाईतील सामाजिक दडपणामागे विशिष्ट कारणे आहेत. मधुमेहाची औषधे घेताना बºयाचदा जीवनशैली आणि आहारावर बंधने येतात. सद्यस्थितीत ही बंधने पाळणे तरुणाईला शक्य नसते. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचा रोजचा दिनक्रम, सवयी बदलल्या आहेत. औषधोपचार करताना अनेक पथ्य पाळावी लागतात. सर्वच रुग्ण काटेकोरपणे याचे पालन करत नाहीत. शिवाय, केवळ मधुमेहच नव्हे, तर इतरही अनके आजारांबाबत तरुणाई हे दडपण बाळगून असते. अशा स्थितीत त्यांचे, त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, ही काळाची गरज आहे. 

टॅग्स :diabetesमधुमेहMumbaiमुंबईHealthआरोग्य