शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 21:31 IST

'गेल्या 60 वर्षात जे होऊ शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात केले आहे आणि 2047 पर्यंत भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईल.'

Nitin Gadkari : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे सर्व क्षेत्रातील लोकांची जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राजकारण असो, व्यवसाय असो किंवा कला क्षेत्र असो...ते सर्व क्षेत्रातील लोकांशी नेहमी आपुलकीने संवाद साधतात. विशेष म्हणजे, गडकरी अनेकदा सार्वजनिक मंचावरुन आपल्या आयुष्यातील वेगवेगळे किस्सेही सांगतात असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी एक असा किस्सा सांगितला आहे, ज्यामुळे दिग्गज उद्योगपती रतन टाटा आणि धीरुभाई अंबानीदेखील चकीत झाले होते. 

शेअर बाजारातून 1200 कोटी रुपये उभे केलेनितीन गडकरी इंडिया टूडेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. एक किस्सा सांगताना ते म्हणाले की, मला मुंबई वरळी उड्डाणपुलासाठी आणखी पैशांची गरज होती, तेव्हा मी बाजारातून 1200 कोटी रुपये उभे केले होते. हे पाहून रतन टाटा आणि धीरूभाई अंबानीदेखील आश्चर्यचकित झाले होते. धीरूभाई अंबानी मला म्हणाले होते की, तू आमच्यापेक्षाही हुशार आहेस.

रस्त्यांवरील खड्डे संपतीलनितीन गडकरी पुढे म्हणाले की, आज ठिकठिकाणी समस्या आहेत, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. पाऊस पडल्यानंतर खड्डे दिसतात. अतिवृष्टीमुळे चांगला रस्ताही वाहून जातो. रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत याची काळजी घेणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही नवीन तंत्रज्ञान आणत आहोत, ज्यामुळे महामार्ग आणि इतर रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. या तंत्रज्ञानाअंतर्गत आठ इंचांपर्यंत काँक्रीट टाकण्यात येणार असून, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.

राजकारणातील कटुता वाढल्याच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, कोणत्याही पक्षाचे नेते माझ्याकडे आले की, मी विभागाला सांगतो की, सर्वांची कामे झाली पाहिजेत. राजकारणात मतं वेगळी असू शकतात, पण सर्वांशी संबंध चांगले असले पाहिजेत. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आम्ही चांगले काम केले आहे. गेल्या 60 वर्षात जे होऊ शकले नाही, ते आम्ही 10 वर्षात केले आहे आणि 2047 पर्यंत भारत एक विकसित देश म्हणून उदयास येईल, असे मी आत्मविश्वासाने सांगत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRatan Tataरतन टाटाDhirubhai Ambaniधीरुभाई अंबानीBJPभाजपा