शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप
2
चारवेळा बलात्कार आणि छळ; PSI चे नाव हातावर लिहून महिला डॉक्टरने स्वतःला संपवले; साताऱ्यात खळबळ
3
Ladki Bahin eKYC: लाडकी बहीणच्या e-KYC साठी दिवाळीची वेळ होती सर्वोत्तम...; पठ्ठ्याने धडाधड घरातल्या, पाहुण्या रावळ्यांच्याही करून टाकल्या...
4
VIRAL VIDEO : 'मराठीत बोला नाहीतर मुंबई सोडा'; एअर इंडिया फ्लाईटमध्ये यूट्यूबरला महिला प्रवाशाची धमकी
5
Piyush Pandey: 'अब की बार, मोदी सरकार', 'हमारा बजाज'सारख्या टॅगलाइनचे जनक, मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं निधन; 'पद्मश्री'ने झाला होता गौरव
6
"हो, मी प्लास्टिक सर्जरी केली...", जान्हवी कपूरने जाहीररित्या स्वीकारलं; म्हणाली, "आईनेच मला..."
7
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
8
कार्तिकी एकादशी २०२५: १ की २ नोव्हेंबर? अचूक तिथी, व्रतनियम आणि तुळशी विवाहाच्या तारखा जाणून घ्या!
9
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
10
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
11
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये कोसळला; १८ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा दुबईत कार्डिएक अरेस्टने मृत्यू
12
Australia Squads vs India : ऑस्ट्रेलियन संघात फेरबदल! टीम इंडियाविरुद्ध मॅक्सवेलही उतरणार मैदानात
13
कार्तिक विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत पूजन, गणपती करेल कल्याण-मंगल; पाहा, महत्त्व-मान्यता
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
15
Stock Market Today: शेअर बाजार उघडताच रेड झोनमध्ये; सेन्सेक्स निफ्टीवर फ्लॅट ट्रेडिंग-डिफेन्स शेअर्समध्ये मोठी खरेदी
16
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
17
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
18
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
19
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
20
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

'उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत असताना जो सन्मान मिळायचा, तो आज आहे का?'- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 20:21 IST

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मतं मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ठळक मुद्देनवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे.अंतर्विरोधाने भरलेलं सरकार देशाच्या इतिहासात कुठेच चाललेलं नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा आणि आम्ही तो मान्य करायचो.

विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून झालेला वाद, युतीत पडलेली फूट, शिवसेनेनं नव्या मित्रांना सोबत घेऊन स्थापन केलेलं सरकार, सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागणं, या सगळ्या राजकीय घडामोडींनंतरही नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्रीचं नातं कायम आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच आज त्याबाबत खुलासा केलाय. उद्धव ठाकरे सरकारला स्थिरस्थावर व्हायला वेळ देणार असल्याचं जाहीर करतानाच, शिवसेनेचे नवे मित्र त्यांना आधीसारखा सन्मान देत नसल्याची जाणीवही त्यांनी जाणीवपूर्वक करून दिली आहे. झी २४ तास वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सत्तापेच, सत्तास्थापनेचं नाट्य, राजकीय भूकंप, फसलेला गनिमी कावा, नवं सरकार, शिवसेनेची भूमिका यावर आपली मतं मांडली.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार किती दिवस टिकेल हे दाव्याने कुणीच सांगू शकत नाही. मला त्यावर काहीच दावा करायचा नाही. कारण, अंतर्विरोधाने भरलेलं सरकार देशाच्या इतिहासात कुठेच चाललेलं नाही, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादीचं ठीक आहे, ते कुठेही फिट होतात. सोयीप्रमाणे कुठलीही भूमिका घेतात. पण, शिवसेना आणि काँग्रेस हा केवढा अंतर्विरोध आहे बघा. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मतं मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?, असा प्रश्न त्यांनी केला. 

आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा, अन्...  

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येतील का, याबद्दल बोलण्यास देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला. मात्र, भाजपा आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती होती. शिवसेना दूर गेली आम्ही नाही गेलो, असं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना किती अपमानित व्हावं लागेल, हे त्यांच्या नक्की लक्षात येईल, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. आमच्यासोबत असताना उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा जो सन्मान होता, तो आज आहे का? त्यांना कुणासोबत बसावं लागतंय, कुठे कुठे जाऊन चर्चा कराव्या लागताहेत, काय-काय सहन करावं लागतंय. आमच्यावेळी 'मातोश्री'वरून आदेश निघायचा आणि आम्ही तो मान्य करायचो, असं देवेंद्र यांनी आवर्जून सांगितलं. 

...पण नंतर धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही!

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रिपूर्ण संबंधांबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही माझे मित्र आहात, या सरकारला काही दिवसांचा वेळ दिला पाहिजे, असं मला उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. मी तो वेळ देणार आहे. काही दिवस चुकीचे निर्णय होतील, जनतेच्या विरोधातले निर्णय होतील त्यावर टीका नक्की करेन. वेळ जरूर घ्या, पण जनहिताचे निर्णय घ्या. ठरावीक काळानंतर ते होत नसेल तर मी धारेवर धरल्याशिवाय सोडणार नाही. माझा डीएनए विरोधी पक्षाचाच आहे. सरकार स्थापन झाल्यापासून निगेटिव्ह निर्णयाशिवाय यांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. खातेवाटप नाही, मंत्रिमंडळ विस्तार नाही. म्हणजेच, वेळेचा सदुपयोग केला जात नाहीए, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी उद्धव ठाकरे आले होते, तेव्हा त्यांच्याशी गप्पा झाल्या. कारण, राजकीयदृष्ट्या भूमिका बदलली असली, तरी वैयक्तिक संबंध त्यांनी किंवा मी संपवलेले नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेस