शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

पेसा निधीतून वंचितांचा विकास साधावा

By admin | Updated: June 8, 2016 02:47 IST

वंचितांच्या विकासाच्या नावाखाली येणारा निधी हा ज्यांच्यासाठी असतो.

वसई/उसगाव डोंगरी: वंचितांच्या विकासाच्या नावाखाली येणारा निधी हा ज्यांच्यासाठी असतो. त्यांच्यापर्यंत जसा पोहचायला हवा होता. तसा तो आजवर पोहचला नाही. १०० रूपयातले ५ किंवा १० रूपये लाभार्थी पर्यंत जातात आणि उरलेले मधल्या-मध्ये ठेकेदारांच्या आणि यंत्रणेच्या खिशात जातात. त्यामुळे स्वांतंत्र्याच्या ७० वर्षा नंतरही विकासापासून वंचित असलेले गाव पाडे आपल्याला आजही पहायला मिळतात. म्हणून कार्यशाळेसाठी उपस्थित असलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी आलेली पै न पै वंचितांच्या विकासासाठीच खर्च होईल हे पाहणे आवश्यक ठरते. आदिवासींच्या हक्काचा पेसा निधी आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधी यातून प्राधान्याने वंचितांच्या विकसासेच कार्य व्हायला हवे. असे प्रतिपादन विधायक संसदेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युल्लता पंडित यांनी केले. त्या विधायक संसद संस्थने उसगाव डोंगरीतील साने गुरूजी प्रशिक्षण संकुलात आयोजित केलेल्या एकदिवसीय ग्रामपंचायत सदस्य कार्यशाळेच्या समारोपीय भाषणामध्ये बोलत होत्या. कार्यशाळेत विधायक संसदेचे सहसंचालक किसन चौरे यांनी कार्यशाळेच्या प्रास्तविकात श्रमजीवी संघटनेमुळेच महाराष्ट्रात पेसा लागू झाला असे सांगितले. ठिणगीच्या कार्यकर्त्या व माजी जि. प. सदस्या आणि गोणे फिरिंगपाडा ग्रामपंचायतीच्या (ता.भिवंडी) माजी सरपंच संंगिता भोमटे, मालबिडी ग्रामपंचायत (ता.भिवंडी) चे माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य जयेंद्र गावित, शिरोळे-बोसे ग्रामपंचायत (ता.भिवंडी) चे माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य सुनिल लोणे यांनी ग्रामपंचातीतील कार्यानुभवाव्दारे ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार आणि कर्तव्यांविषयी प्रभावी विवेचन केले. विधायक संसदेचे सहसचिव प्रदीप खैरकर यांनी गावाचा विकास आराखडा तयार तयार करताना घ्यावयाच्या खबरदारीबद्दल शिबीरात पीपीटीच्या सहाय्याने मार्गदर्शन केले. ग्रामविकास आराखडा प्रशिक्षक महेश भोईर यांनीही मार्गदर्शन केले. ठाणे, पालघर व नाशिक जिल्हयातून १०७ ग्रामपंचायत सदस्य या कार्यशाळेत सहभागी झाले होते. श्रमजीवी संघटनेचे कार्याध्यक्ष केशव नानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शिबिराच्या संयोजनात संघटनेचे सरचिटणिस बाळाराम भोईर, सहसरचिटणिस विजय जाधव यांचेसह सुरेश रेंजड, दशरथ भालके, सरिता जाधव, केशव पारधी, गणेश उंबरसाडा, कैलास तुंबडा, संतोष धिंडा, प्रकाश खोडका, आशा भोईर, मनोज काशिद, जनार्दन ठाकरे, यांचा मोठा सहभाग होता. (वार्ताहर)पाहुण्यांना, अभ्यागतांना दिले जांभळाचे रोपजागतिक पर्यावरण दिनी झालेल्या कार्यशाळेत त्यांनी गाव विकास आराखडयाच्या माध्यमातून गावक्षेत्रातील डोंगरभागामध्ये मोठया प्रमाणात चर खोदून पाणलोट विकासाची कामे करण्याचे आणि झाडे लावण्याचे आवाहन केले. शिबिरार्थीच्या कार्यशाळेतील स्वागताचा भाग म्हणून गुलाब पुष्पाऐवजी ग्रामपंचायत सदस्याला घरी जाताना जांभळाचे रोप संस्थेच्या वतीने देण्यात आले.