शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ऊस क्षेत्र घटल्याने दराचा प्रश्न ऐरणीवर; काटा पेमेंटच्या मागणीनेही धरला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:23 IST

यंदाचा साखर हंगाम; सातत्याने चांगला दर देणाºया कारखान्यांसाठी अडचणी कमी

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जसे वाढत गेले तशी साखर कारखान्यांची संख्याही वाढत गेलीसर्वाधिक ३९ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याला मागील वर्षी दुष्काळाचा फटका बसला आहेआतापर्यंत चांगला दर व वेळेवर पैसे देऊन शेतकºयांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्यांना उसाची अडचण येणार

अरुण बारसकर 

सोलापूर: उसाचे क्षेत्र मागील वर्षापेक्षा ५० टक्क्यांनी घटल्याने दराचा विषय ऐरणीवर आला असून, दर वाढवून द्या, शिवाय काटा पेमेंट (रोख पैसे) देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. मात्र आतापर्यंत चांगला दर व वेळेवर पैसे देऊन शेतकºयांचा विश्वास संपादन केलेल्या कारखान्यांना उसाची अडचण येणार नाही, असे साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे मत आहे. 

सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र जसे वाढत गेले तशी साखर कारखान्यांची संख्याही वाढत गेली. सर्वाधिक ३९ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याला मागील वर्षी दुष्काळाचा फटका बसला आहे. पाण्याअभावी ऊस जळून गेला, जनावरांच्या छावण्यासाठी उसाची मोठ्या प्रमाणावर तोडणी झाली व त्यातूनही चांगल्या पद्धतीने वाढ झालेल्या उसाची आता बेण्यासाठी तोडणी होत आहे. 

या सर्व प्रकारामुळे उसाचे क्षेत्र ५० टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३९ पैकी ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी ऊस नसल्याने २६ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केला आहे. मात्र उसाची उपलब्धता पाहिली असता २६ कारखानेही सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. असे असले तरी एफआरपीपेक्षा अधिक दर व काटा पेमेंट देण्याची मागणी शेतकरी साखर कारखान्यांकडे करू लागले आहेत.

जिल्ह्यातील सध्याचे ऊस क्षेत्र पाहता दराची स्पर्धा होईल, असा शेतकºयांचा सूर असला तरी साखर कारखानदारांचेही शक्यतो मर्यादित कारखाने सुरू करण्यावर एकमत झाले असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी शेतकºयांकडून एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची मागणी केली जात आहे. दराचे अगोदर बोला, मगच ऊस मागा असे जाहीरपणे शेतकरी ठणकावून सांगत असल्याचे साखर कारखान्यांच्या कृषी अधिकाºयांनी सांगितले. उसासाठी शेतकºयांपर्यंत आमचे कर्मचारी गेल्यानंतर अगोदर दर जाहीर करा व काटा पेमेंट देण्याची मागणी शेतकरी करीत असल्याचे कृषी अधिकाºयांकडून सांगण्यात आले. 

मात्र ज्या कारखान्यांनी आतापर्यंत चांगला दर, वेळेवर पैसे दिले व शेतकºयांना चांगली वागणूक  दिली, अशा कारखान्यांनी उसाची फार अशी अडचण येणार नाही, असे सांगण्यात आले. 

पाऊस चांगला आहे, शासनाच्या कायद्यानुसार ऊस गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीची रक्कम दिली जात नाही. कायद्याचे पालन न करणाºया कारखान्यांवर कारवाई केली पाहिजे. प्रति टन साडेतीन हजार रुपये दर यावर्षी दिला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. साखर उपपदार्थांवर ऊसदर ठरवावा. दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही.-प्रभाकर देशमुखजनहित शेतकरी संघटना

आमच्या संघटनेचे ऊसदराचे धोरण २४ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेत ठरणार आहे. मात्र सध्या सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र पाहता प्रति टन तीन हजार रुपये दर मिळावा, ही अपेक्षा आहे. पाण्याची टंचाई असताना ऊस जोपासण्यासाठी शेतकºयांना पडलेल्या कष्टांचा विचार कारखानदारांनी करावा. -महामूद पटेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना

जिल्ह्याच्या पश्चिम भागात ६० टक्के ऊस चांगला आहे तर पूर्व भागात ३५ ते ४० टक्के इतकाच ऊस आहे. दराची स्पर्धा व उसाची पळवापळवी होईल. साखरेचा किमान दर प्रति क्विंटल ३१०० रुपये असल्याने तसेच बँका कर्ज देत नसल्याने कारखान्यांना अधिक दर देणे परवडत नाही. शासनाने साखरेवरील कर कमी करावा. - रविकांत पाटील, प्रेसिडेंट, गोकुळ माऊली

शेतकºयांचा चांगला व वाईट काळ आला तरी आम्ही शेतकºयांना ठरल्याप्रमाणे दर व पैसे देतो. शिवाय शेतकºयांना सवलती देतो. शेतकºयांच्या अडचणी समजून मार्ग काढतो. त्यामुळे आमचे सभासद ऊस आमच्याच कारखान्याला घालतील. १५ जानेवारीपर्यंत करकंबचा कारखाना सुरू करीत आहोत.- राजेंद्रकुमार रणवरे, कार्यकारी संचालक, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना

दुष्काळाचा फटका आमच्या कारखान्यालाही बसेल, मात्र दरात सातत्य ठेवल्याने सभासद आम्हालाच ऊस घालतील. श्रीपूर भागात ऊस क्षेत्र बºयापैकी असल्याने गाळपाला अडचण येईल, असे वाटत नाही. एफआरपीप्रमाणे व त्यापेक्षा अधिक दर देण्याबाबतचा निर्णय संचालक मंडळ घेईल.- यशवंत कुलकर्णी, कार्यकारी संचालक, पांडुरंग श्रीपूर.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती