शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कायद्यातील बदलाचा निर्णय न्याययंत्रणेवर सोडा

By admin | Updated: September 17, 2016 03:56 IST

अ‍ॅट्रोसिटी कायदा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दलित समाजाला दिलेली कवचकुंडले आहेत. त्याचा गैरवापर होतोय का, याचा निर्णय न्याययंत्रणा घेईल.

मुंबई : ‘अ‍ॅट्रोसिटी कायदा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दलित समाजाला दिलेली कवचकुंडले आहेत. त्याचा गैरवापर होतोय का, याचा निर्णय न्याययंत्रणा घेईल. मोर्चे काढून कायद्यात बदल होत नाही’, असे मत खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात जाधव बोलत होते.
जाधव म्हणाले की, मराठा समाजाकडून काढण्यात येणारे मोर्चे मूक असून ते दलितविरोधी वाटत नाहीत. त्यांच्याविरोधात दलित समाजाने मोर्चे काढायचे की नाही, याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा. लोकशाहीने प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिला आहे. मात्र मोर्चे काढून कधीही कायद्यात बदल होत नसतो. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होतोय की नाही, हे न्याययंत्रणा ठरवेल. तसेच त्यात सुधारणा करायची गरज असल्यास लोकसभा आणि राज्यसभेत तशी तरतूद केली जाईल. याआधी २०१५ साली अ‍ॅट्रोसिटी कायद्यात बदल झाला आहे. अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मराठा मोर्चा आणि अ‍ॅट्रोसिटी कायद्याबाबत जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली. आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध करत हा अक्षम्य अपराध असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांना दलित समाजापुरते मर्यादित ठेवण्यात आल्याची खंतही जाधव यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)