शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

"लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा’’, जयंत पाटलांचा सरकारला टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 23:16 IST

Jayant Patil Criticize Maharashtra Government: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून  निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात येत असलेल्या योजनांवरून टोला लगावला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून आणण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीकडून या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना लाभ होईल, असा दावा केला जात आहे. तर विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील नेतेमंडळी या योजनेची खिल्ली उडवत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडून  निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात येत असलेल्या योजनांवरून टोला लगावला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ झाला, आता लाडकी बायको योजना सुरू करा, असा खोचक सल्ला जयंत पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. 

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, सध्याच्या घडीला राज्यातील महायुती सरकार भेदरलेल्या स्थितीत आहे. काय करू आणि मतं मिळवू असं त्यांना झालेलं आहे. त्यांनी लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना आणल्या आहेत. आता लाडकी बायको अशी एक योजनाही आणा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.  

यावेळी आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही जयंत पाटील यांनी टीका केली. तसेच या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा आरोप त्यांनी केला. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली गेली आहेत. तसेच या अर्थसंकल्पामधून कुठलीही ठोस योजनाही सादर केली गेलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी