शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

धरण उशाला? मग सुविधा कशाला?

By admin | Updated: August 15, 2016 03:52 IST

शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण भागातील गरीबांना नेहमीच लाथाडले जाते.

- पंकज पाटील,

बदलापूर/मुरबाड- शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामीण भागातील गरीबांना नेहमीच लाथाडले जाते. त्यांना वाली नसतो, हे बारवी धरणाच्या उंची वाढविण्यावरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले. ‘आधी पुनर्वसन नंतर धरण’ या घोषणा देऊन-तसे धोरण ठरवूनही बाधितांचे जेथे पुनर्वसन करायचे आहे तेथे प्राथमिक सुविधाही नाहीत. त्यामुळे कोयना धरणग्रस्तांपासून आजतागायत कितीही धरणे झाली-धोरणे झाली पण राजकारण्यांची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची वृत्ती बदलायला तयार नाही. ज्यांची घरे गेली त्यांना सुविधा देऊन उपकार करतो आहोत, ही भावना असेल तर नेमके काय घडू शकते याचे बारवी धरणग्रस्त हे आणखी एक उदाहरण ठरावे. पुनर्वसनासाठी भरपूर काळ हाती असूनही धरणग्रस्तांची जी परवड सुरू आहे ती पाहता शेतकरी जमिनी देण्यास का तयार होत नाहीत, याचे उत्तर चुटकीसरशी मिळते.ठाणे जिल्ह्यातील निम्मी शहरे आणि एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाची उंची वाढविण्यात आल्याने धरणाखाली जाणाऱ्या गावांत पाणी शिरू लागले आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या स्थलांतराच्या हालचाली सुरू झाल्या. नोकरीच्या आश्वासनावर, प्रसंगी रोख भरपाईवरही शिक्कामोर्तब झाल्याने सारे आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले. पावसाळा सुरू होण्याअगोदर एमआयडीसीचे अधिकरी पुनर्वसन कुठे, कसे केले जाईल, त्यासाठी यंत्रणा कशी जय्यत तयारीत आहे, याच्या पत्रकार परिषदा घेत असल्याने कोयना धरणापासून सुरू असलेली धरणग्रस्तांची परवड यावेळी होणार नाही, असा विश्वास सर्वांना वाटत होता. पाणी शिरणाऱ्या गावातील चित्र भयावह आहे. पुनर्वसनाचा निकाल लागेपर्यंत आदिवासी घरे सोडण्यास तयार नाहीत. त्याचवेळी मुरबाड तालुक्यात जेथे ग्रामस्थांचे पुनर्वसन होणार आहे, तेथील परिस्थिती भयावह आहे. आपले घर-दार, सर्वस्व सोडून देशोधडीला लागलेल्या कुटुंबासाठी साध्या-साध्या सुविधांचा विचारच झालेला नाही. पुनर्वसनाच्या श्रेयाचे फलक झळकत आहेत, पण ज्यांचे आयुष्य विस्कटून गेले आहे त्यांच्याकडे पाहण्याचा सरकारी यंत्रणांचा दृष्टीकोन तसाच आहे. बुडणाऱ्या गावांमधील परिस्थिती जशी विषण्ण करणारी आहे, तशीच पुनर्वसनाच्या ठिकाणची. या धरणात तिसऱ्यांदा बाधित होणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना कागदावरच्या सरकारी पॅकेजसोबत मूलभूत सुविधांची गरजही भासणार आहे, पण यंत्रणांच्या ते गावीही नाही.