शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात कापसाचे क्षेत्र वाढणार!

By admin | Updated: June 2, 2015 01:15 IST

व-हाडात सर्वाधिक क्षेत्र वाढण्याची शक्यता!

अकोला : यावर्षी पाऊस वेळेवर पण सरासरी कमी होणार असल्याचे भाकीत असल्याने सोयाबीन बियाण्यांसंबंधी शेतकर्‍यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर शेकडो शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पीक पेरणीसाठीचे नियोजन केले असून, विदर्भात यावर्षी एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यामुळे हे क्षेत्र ३७ लाख हेक्टरपर्यंंत खाली घसरले आहे. प्रामुख्याने विदर्भातील शेतकर्‍यांनी कापसाचे क्षेत्र कमी केले असून, त्यांनी सोयाबीन या पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच गतवर्षी राज्यात कधी नव्हे एवढे म्हणजेच ३१.६२ लाख हेक्टर सोयाबीन क्षेत्रात भर पडली होती. यामध्ये सर्वाधिक सोयाबीनची वाढ कापूस पट्टा असलेल्या पश्‍चिम विदर्भात १५.५0 लाख हेक्टर एवढी झाली. गेल्यावर्षी सोयाबीनची पेरणी मोठय़ा प्रमाणात झाली होती. तथापि गेल्यावर्षी झालेला कमी पाऊस आणि काढणीच्यावेळी झालेला अवकाळी पाऊस, यामुळे सोयाबीन उत्पादन घटल्याने यावर्षी प्रमाणित सोयाबीन बियाणे मिळेल की नाही, याबाबत शेतकर्‍यांमध्ये साशंकता आहे. दरम्यान, अप्रमाणित बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असल्याने ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले, त्यांना या बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. यामुळेच शेतकरी कापूस पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भात कापसाचे क्षेत्र हे अठरा लाख हेक्टर होते, ते घसरू न कमी झाले होते. यामध्ये यावर्षी पाच ते सात लाख हेक्टरने वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा पेरा वाढणार असला तरी त्यासाठीदेखील ३0 जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची गरज आहे. खरीप हंगामातील मूग, उडीद, ज्वारीची पेरणी ही मृग नक्षत्रातच होणे अपेक्षित असते; परंतु पाऊस वेळेवर येणे आवश्यक आहे. पावसाने विलंब केल्यास गतवर्षाचा अनुभव बघता, यावर्षी या क्षेत्रावर कापूस पेरा वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज अकोलास्थित कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. टी.एच. राठोड यांनी वर्तविला.