शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

CoronaVirus ‘ते’ तबलिगी समोर न आल्यास कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:54 IST

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती; मोबाइल स्विच आॅफ केलेल्यांचाही सुरू आहे शोध

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तबलिगी जमातीचे जे लोक दिल्लीच्या मरकजहून परतले त्यांच्यापैकी महाराष्ट्रात परतलेल्या १,३५५ जणांची ओळख पटविण्यात आली आहे. त्यापैकी १३०० जणांच्या आवश्यक चाचण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वा त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. जे लोक स्वत:हून हजर होणार नाहीत त्यांचा आम्ही शोध घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री आनिल देशमुख यांनी दिला आहे.

‘लोकमत’शी बोलताना देशमुख म्हणाले की, त्यांच्यापैकी ५०-५५ लोक असे आहेत की ज्यांना अद्याप ताब्यात घेता आलेले नाही किंवा ते स्वत:हून हजर झालेले नाहीत. बहुतेकांनी मोबाईल स्विच आॅफ केलेले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मोबाईल स्विच आॅफ असला तरी त्याचा ठावठिकाणा आजकाल काढता येतो. सायबर सेलच्या माध्यमातून तसे प्रयत्न केले जात आहेत. लवकरच त्याला यश येईल. दिल्लीच्या मरकजमध्ये महाराष्ट्रातून जे लोक गेले होते त्यांची नावे, पत्ते आम्ही दिल्लीतून मिळवले, त्यानुसार शोध मोहीम राबविली. काहीजण स्वत:हून पोलीस व आरोग्य यंत्रणेकडे हजर झाले व त्यांनी सहकार्य केले.

लाठी वापरण्यास भाग पाडू नकालॉकडाऊनच्या काळात बंदी आदेश मोडून लोक बेफाम फिरत असतील तर लाठी चालवावीच लागेल, याचा देशमुख यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, बेफाम लोकांनी पोलिसांवर हल्ल्याच्या ४८ घटना घडल्या आहेत. त्यात शंभरावर लोकांना अटक करण्यात आली.बंदी मोडणाऱ्या नागरिकांची ७,५७० वाहने जप्त केली आहेत. ६६ लाख रुपयांचा दंडही आकारला आहे.

११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटकाकारागृहात असलेले ११ हजार आरोपी व कैदी यांच्या पॅरोलबाबतही सर्व ६० कारागृहांना निर्देश देऊन कैद्यांच्या गुन्हे व झालेल्या शिक्षेच्या अनुषंगाने पॅरोलवर सोडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे सूचित केले. त्यानुसार हे कैदी पॅरोलवर सुटत आहेत.

सायबर गुन्ह्यास अटकावक्वारंटाईनबाबत जे चुकीचे संदेश समाज माध्यमाद्वारे पसरविण्यात येत होते त्यांनाही आळा बसला आहे. या चुकीच्या संदेशांबाबत ३४७ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे . तसेच भादविच्या कलम १८० नुसार २३ हजार १२६ घटनांची नोंद झाली आहे.कोरोनासंदर्भात समाज माध्यमावर होत असलेल्या अपप्रचारास अटकाव करण्याचे निर्देश दिल्यामुळे यात एप्रिल फुलसारख्या संदेशांनाहीरोख लागला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAnil Deshmukhअनिल देशमुख