शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Coronavirus : जगानं वाभाडे काढले; कोकणातले, विदर्भातील पोपट आता शांत का?; अरविंद सावंत यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 16:33 IST

कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य

ठळक मुद्देकोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू, सावंत यांचं वक्तव्य कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत, सावंत यांचा टोला

सध्या देशात कोरोनाच प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य सेवांवर मोठा ताण पडत आहे. अनेक देशांनी भारताकडे आता मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु काही परदेशातील माध्यमांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून टीकाही केली होती. यावर तसंच निवडणुकीच्या निकालावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाष्य केलं. "देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत, असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला.

"काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सांगितलं मी एकरकमी पैसे द्यायला तयार आहे मला १२ कोटी लसी द्या. आम्ही बाजारातून खरेदी करतो त्याला परवानगी द्या असंही ते म्हणाले. आता तुम्ही करताय पण सर्वात पहिल्यांदा लष्कराची मदत घेऊन ऑक्सिजनची वाहतूक करा असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तेदेखील ऐकलं नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं. चांगल्या सूचना आल्या की त्या स्वीकारून पुढे जावं. त्यांचे इथले पोपट राज्यावर तुटून पडत होते त्यांना आता केंद्राकडे जाऊन या तुमच्या त्रुटी आहेत असं सांगण्याची हिंमत आहे का? आता बिळात लपून बसलेत सगळे," असं म्हणत सावंत यांनी केंद्रावर निशाणा साधला. एका मराठी वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "लसीकरणातही महाराष्ट्र आघाडीवर आहे. परंतु दुर्देवानं कोरोनाबाधितांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुंबईतील संख्या आता कमी होतेय आणि ती अजून कमी व्हायला हवी. लॉकडाऊन लावताना जे सर्व पोपट काही गोष्टी सुरू करण्याची भाषा करत होते त्यांना आता पुढे भारतात फिरणंही मुश्किल होईल. किती गोष्टी लपवणार?" असा सवालही त्यांनी केला. जिंकणं आणि हरणं हा शेवटचा प्रश्न आहे. जगणं हा महत्त्वाचं आहे. यावेळी त्यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीवरही भाष्य केलं. पंढरपुरात काहींना वाटतंय की देवळात जाऊ दिलं नाही. भाजपनं याठिकाणी लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं. त्याचा हा परिणाम दिसत असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितलं.... म्हणूनच सर्व शांत"देशाची मलीन झालेली प्रतीमा पुन्हा चांगली करणं कठिण होईल. जगानं वाभाडे काढले. म्हणूनच सर्व शांत आहे. कोकणातले पोपट, विदर्भातले पोपट सगळे शांत आहेत. असं काही झालं तरी आम्हाला आनंद नाही होत. आमच्या देशाचे पंतप्रधान आहे. कोरोनावर मात करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. राजकीय आखाडे नंतर भरवू,"असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारतElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाArvind Sawantअरविंद सावंत