शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:51 IST

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देप्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहेराज ठाकरेंच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप महाराष्ट्रात दारुबंदी करावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि आस्थापनं ठप्प आहेत. अशामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.

राज्यात ६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २० एप्रिलपासून राज्यातील काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. अनेक कामकाज ठप्प पडल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. राज्यातील महसूलात घट होत असल्याचं दिसून येतं. यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या.

यात राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. त्याचसोबत जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे असं सांगत दारू पिणाऱ्यांचा नाही तर राज्यातील घटत्या महसूलाचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेसाठी स्वतःच्या खिशात हात घालावा. प्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहे, कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते. कारण सत्तेत नसताना आणि फक्त एक आमदार असताना नागरिकांची काळजी करायची सोडून ‘दारू दुकानदारांची, बार मालकांची व दारू कंपन्यांच्या उद्योगपती मालकांची काळजी करणे सध्या गैर आहे. याउलट महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शेतकरी, हातावर पोट असणारे कामगार, छोटे व्यावसायिक प्रचंड अडचणीत आहेत. या काळात अनेक लोकांना खायला अन्न मिळत नाही. त्याची काळजी केली नाहीतर भूकबळी वाढतील. संघर्ष काळात दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांना सुरक्षेसाठी आरोग्य किट मिळणे अपेक्षित आहे. गावोगावी त्याचा पुरवठा व्हायला हवा. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस