शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:51 IST

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देप्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहेराज ठाकरेंच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप महाराष्ट्रात दारुबंदी करावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि आस्थापनं ठप्प आहेत. अशामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.

राज्यात ६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २० एप्रिलपासून राज्यातील काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. अनेक कामकाज ठप्प पडल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. राज्यातील महसूलात घट होत असल्याचं दिसून येतं. यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या.

यात राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. त्याचसोबत जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे असं सांगत दारू पिणाऱ्यांचा नाही तर राज्यातील घटत्या महसूलाचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेसाठी स्वतःच्या खिशात हात घालावा. प्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहे, कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते. कारण सत्तेत नसताना आणि फक्त एक आमदार असताना नागरिकांची काळजी करायची सोडून ‘दारू दुकानदारांची, बार मालकांची व दारू कंपन्यांच्या उद्योगपती मालकांची काळजी करणे सध्या गैर आहे. याउलट महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शेतकरी, हातावर पोट असणारे कामगार, छोटे व्यावसायिक प्रचंड अडचणीत आहेत. या काळात अनेक लोकांना खायला अन्न मिळत नाही. त्याची काळजी केली नाहीतर भूकबळी वाढतील. संघर्ष काळात दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांना सुरक्षेसाठी आरोग्य किट मिळणे अपेक्षित आहे. गावोगावी त्याचा पुरवठा व्हायला हवा. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस