शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Coronavirus: “कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते”; राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 08:51 IST

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देप्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहेराज ठाकरेंच्या मागणीवर संभाजी ब्रिगेडने घेतला आक्षेप महाराष्ट्रात दारुबंदी करावी, संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. या लॉकडाऊनमुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार आणि आस्थापनं ठप्प आहेत. अशामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे.

राज्यात ६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. २० एप्रिलपासून राज्यातील काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यात आलं आहे. अनेक कामकाज ठप्प पडल्याने राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडला आहे. राज्यातील महसूलात घट होत असल्याचं दिसून येतं. यासाठी दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या.

यात राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. त्याचसोबत जवळपास १८ मार्च पासून राज्य टाळेबंदीत आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. अशा काळात किमान 'वाईन शॉप्स' सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे असं सांगत दारू पिणाऱ्यांचा नाही तर राज्यातील घटत्या महसूलाचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती.

राज ठाकरेंच्या वाईन्स शॉप सुरु करण्याच्या मागणीवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज्यातील जनतेसाठी स्वतःच्या खिशात हात घालावा. प्रमुख सेवांकडे दुर्लक्ष करून दारूची आठवण होते हे चुकीचे व संशयास्पद आहे, कदाचित बऱ्याच नेत्यांचा स्टॉक संपला असावा अशी शंका येते. कारण सत्तेत नसताना आणि फक्त एक आमदार असताना नागरिकांची काळजी करायची सोडून ‘दारू दुकानदारांची, बार मालकांची व दारू कंपन्यांच्या उद्योगपती मालकांची काळजी करणे सध्या गैर आहे. याउलट महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले की, कोरोना महामारीमुळे शेतकरी, हातावर पोट असणारे कामगार, छोटे व्यावसायिक प्रचंड अडचणीत आहेत. या काळात अनेक लोकांना खायला अन्न मिळत नाही. त्याची काळजी केली नाहीतर भूकबळी वाढतील. संघर्ष काळात दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांना सुरक्षेसाठी आरोग्य किट मिळणे अपेक्षित आहे. गावोगावी त्याचा पुरवठा व्हायला हवा. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली पाहिजे असं ते म्हणाले.

 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस