शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: तसे कोणतेही आदेश आलेले नाहीत; गृहमंत्र्यांनी फेटाळला रेल्वेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 09:52 IST

CoronaVirus marathi News मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका; राज्य सरकारचं रेल्वेला आवाहन

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात लाखो मजूर अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पोहोचवण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्या सुरू केल्या. मात्र या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेत असल्याची माहिती पुढे येताच राजकारण तापलं. रोजगार गमावलेल्या, संकटात सापडलेल्या मजुरांकडून पैसे कसले घेता, असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित करताच तिकीट दरात ८५ टक्के सलवत दिली जात असल्याची माहिती दिली गेली. उर्वरित १५ टक्के रक्कमदेखील संबंधित राज्य सरकारांकडून घेत असल्याचं रेल्वेनं सांगितलं. मात्र रेल्वेनं असे कोणतेही आदेश काढले नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. मुंबईत अशा कामगारांची संख्या फार मोठी आहे. त्या सर्वांना आपापल्या राज्यात जायचं आहे. काल सर्व वर्तमानपत्रांमध्ये बातमी होती की, केंद्रातल्या रेल्वे खात्याच्या माध्यमातून तिकिटांवर ८५ टक्क्यांची सवलत परप्रांतीय कामगारांना देण्यात आली आहे. पण आजच्या तारखेपर्यंत असे कोणतेही आदेश रेल्वे विभागानं काढलेले नाहीत. त्यामुळे आज जे सर्व परप्रांतीय आपापल्या राज्यात चालले आहेत, त्यांना स्वत:च्या खिशातले पैसे खर्चून तिकीट काढावं लागतं आहे. आज परप्रांतीय कामगारांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत,' असं देशमुख म्हणाले. आपल्या गावी परतणाऱ्या कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नये अशी विनंती मी पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाला राज्य शासनाच्या माध्यमातून करतो, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.

काय होता रेल्वेचा दावा?रेल्वेकडून प्रवासी मजुरांना कोणतीही तिकीटं विकली जात नाहीयेत. रेल्वे राज्य सरकारांकडून केवळ खर्चाच्या १५ टक्के रक्कम आकारत आहे, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं. 'भारतीय रेल्वेकडून श्रमिक गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगची पूर्ण काळजी घेतली जात आहे. या गाड्या श्रमिकांना सोडून रिकाम्या परतत आहेत. परतत असताना त्या पूर्णपणे बंद असतात. रेल्वेकडून मजुरांना मोफत जेवण आणि पाण्याची बाटली दिली जाते,' असंदेखील रेल्वेकडून सांगण्यात आलं.

पत्र समोर आल्यानं रेल्वेची गोचीमजुरांच्या तिकीट खर्चावरुन राजकीय वाद निर्माण झाला असताना रेल्वेचं एक पत्र समोर आलं आहे. राज्य सरकारांनी मजुरांना रेल्वेची तिकीटं हस्तांतरित करावीत आणि तिकीट भाडं गोळा करून ते रेल्वेकडे जमा करावं, अशी सूचना रेल्वेच्या पत्रात आहे. या पत्रावर २ मे ही तारीख आहे. देशभरात अडकलेले प्रवासी मजूर, भाविक, पर्यटक, विद्यार्थ्यांसाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असल्याचा उल्लेखदेखील या पत्रात आहे.ज्या राज्यांमध्ये विशेष ट्रेन सोडल्या जाणार आहेत, त्या राज्यांनी मजुरांची यादी रेल्वेला द्यावी. त्याप्रमाणे रेल्वेकडून तिकीटं छापली जातील. त्यानंतर राज्य सरकारांना रेल्वेकडून तिकीटं दिली जातील. राज्य सरकारांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तिकीटं मजुरांना द्यावीत आणि त्यांच्याकडून आलेलं तिकीट भाडं रेल्वेकडे जमा करावं, असा मजकूर रेल्वेच्या पत्रात आहे.मोठा खुलासा; 'श्रमिक ट्रेन'मधील मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नाहीए सरकार, फक्त...तिकीट भाडं वसूल करून पैसे आम्हाला द्या; 'ते' पत्र समोर आल्यानं रेल्वेची गोचीघरी परतणाऱ्या मजुरांच्या प्रवासाचा खर्च उचलणार काँग्रेस, सोनिया गांधींची मोठी घोषणा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखIndian Railwayभारतीय रेल्वे