शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

coronavirus: ई-पासच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 19:06 IST

केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.  

पुणे - केंद्र सरकारने देशाला डोळ्यासमोर ठेऊन ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, राज्यातील प्रमुखांना स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावे लागतात.  इतर राज्यातील भौगिलिक व कोरोनाची परिस्थितीही वेगळी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून ई-पासबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दाऊदच्या पाकिस्तानातील रहिवास असल्याचा मुद्दाही एकादृष्टीने महत्वाचा आहे़ आपल्या देशात वेगवेगळ्या अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोटमध्ये त्याचा हात आहे़ परंतु आता कोरोनाचे संकट आहे, याबाबतीत केंद्र सरकार व त्यांचे वरिष्ठ अधिकारी पुढील कार्यवाही करीत आहेत़  जम्बो हॉस्पिटल बंद झाल्यावर येथील सुविधा शासकीय रूग्णालयांतपरदेशात ज्या कंपन्या नावाजलेल्या आहेत अशा कंपन्यांकडून जम्बो हॉस्पिटलकरिता व्हेंटिलेटर बेड व अन्य सुविधा घेण्यात आल्या असून, जम्बो हॉस्पिटल बंद झाल्यावर या सर्व सुविधा आपण शासकीय रूग्णालय, ससून हॉस्पिटल, महापालिकेच्या रूग्णालयात तसेच ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. जम्बो हॉस्पिटलचा सहा महिन्यांसाठी करार करण्यात आला आहे़ पण यदाकदाचित काही घडले तर बेडची कमतरता पडू नये यासाठी सरकारला खबरदारी घ्यावी लागते, त्यानुसार या हॉस्पिटलची उभारणी केली आहे़ सध्या शिवाजीनगर, मगर मैदान व बाणेर येथे सीएसआर मधून असे एकूण १ हजार ८५० अधिकचे बेडसह खाजगी हॉस्पिटलमधील अधिकचे बेड उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे आजमितीला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये बेड नाही अशी वेळ येत नसल्याचे म्हणाले. दरम्यान, पुण्याप्रमाणेच नाशिक, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यात जम्बो हॉस्पिटल उभारण्याऐवजी, मंगल कार्यालयांची मोठी सभागृहे घेऊन तेथे कोविड रूग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ नाशिकमध्ये अशारितीने सेंटर उभे राहिले असल्याचेही पवार यांनी सांगितले़  पार्थ पवार विषयावर बोलणे टाळलेजम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी हॉस्पिटल व अन्य सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली़ अखेरीस त्यांना पार्थ पवार यांच्या विषयी छेडले असता, ज्या विषयावर मी बोलणारच नाही त्या विषयावर विचारून काय उपयोग असे सांगून त्यांनी या प्रश्नावर अधिकचे बोलणे टाळणेच पसंत करून पुढील कार्यक्रमाकडे गेले़ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवार