शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 18:40 IST

SSC, HSC Exam, Minister Vijay Wadettiwar Statements on Corona Situations: अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे

ठळक मुद्देया परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहेराज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाहीकाही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेऱ्या कमी करणेदहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग, शिक्षणमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई - राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं असून वाढणाऱ्या रुग्णसंख्येने ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवली आहे, अशातच आता शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने शिक्षण विभागाचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील काळात सरकार पर्यायी मार्गाचा विचार करणार असल्याचं विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.( Looking at Corona's situation, passing 10th and 12th class students without examination? Minister Vijay Wadettiwar Statements)  

अगदी काही महिन्यांवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊन ठेपल्या आहेत, अशातच कोरोना रुग्णवाढीमुळे परीक्षेवर भीतीचं सावट आहे, या परीक्षा यंदा तरी होणार का? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे, परीक्षेवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे, महत्त्वाचं म्हणजे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू असल्याचं ते म्हणाले, टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या आकडेवारीने गांभीर्य वाढलं आहे, राज्याच्या अर्थकारणाला पुन्हा लॉकडाऊन करणं परवाडणारं नाही, अशातच काही गोष्टींवर निर्बंध आणता येतील का याचा विचार सुरू आहे, यात लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसमधील गर्दी कमी करणे, सिनेमागृह-विवाहस्थळे येथे होणाऱ्या गर्दीवर आळा घालणे यासारख्या गोष्टींवर विविध पर्याय शोधावे लागणार आहेत. येत्या काळात हे निर्णय लवकरच अपेक्षित असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितले.

तामिळनाडूचा पॅटर्न महाराष्ट्र स्वीकारणार?

तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी ९ वी ते ११ इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, कोरोनामुळे लेखी परीक्षा घेणं शक्य नाही, त्यामुळे २०२०-२१ या शालेय वर्षात विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न घेता पास करण्यात येईल अशी घोषणाच मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तामिळनाडूत जे केलं तसेच महाराष्ट्रात होणार का? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

दहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आम्हाला भाग आहे – शिक्षणमंत्री

दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचा कोणताही निर्णय झाला नाही, दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे असतात. विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहे, कोरोनाचा धोका आणि परीक्षेचे टेन्शन हे यामुळे सगळं वातावरण चिंतेत आहे, दहावी-बारावीच्या परीक्षा घेणं आवश्यक आहे, कारण या मुलांना पुढे अकरावी आणि इतर प्रोफेसनल कोर्ससाठी प्रवेश घ्यावा लागतो, त्यासाठी या परीक्षा महत्त्वाच्या आहे, परीक्षा रद्द केल्याचं कुठलंही वक्तव्य मी केले नाही असं स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे, त्या एबीपी माझाशी बोलत होत्या.

वाशिमच्या निवासी शाळेत आढळले २२९ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

रिसोड तालुक्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील कोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली. शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

राज्यात कोरोनाचा कहर

राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला असून, सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांवर नव्या रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दिवसभरात ८,७०२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईतही गुरुवारी  १ हजार १४५ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५ जणांचा मृत्यू झाला.  १८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोरोनावाढीचा दर ०.२५ टक्के इतका आहे. मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा कालावधी २७३ दिवस आहे. मुंबईखालोखाल नागपूर, पुणे, पिंपरी, नाशिक, अकोला आणि औरंगाबाद या शहरांत प्रादुर्भाव वाढत आहे. अमरावतीत ९०६ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार