शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

coronavirus: कोरोना इफेक्ट : सहकार क्षेत्राचे कंबरडे मोडणार

By यदू जोशी | Updated: May 14, 2020 07:17 IST

लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता भासेल.

- यदु जोशी मुंबई : राज्याच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सहकार क्षेत्राला कोरोनाच्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून लहान मोठ्या सहकारी संस्था, बँका यांना मोठी झळ बसत आहे. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना रखडली आहे.कर्जमाफी योजनेअंतर्गत ३० लाख शेतकऱ्यांची यादी मंजूर करण्यात आली होती. त्यातील १९ लाख शेतक-यांना १२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. मात्र ११ लाख शेतक-यांना अद्याप कर्जमाफी मिळायची आहे. निधी वाटपाबाबत आणलेली बंधने आणि लॉकडाउनमुळे प्रमाणीकरण अशक्य असल्याने ही योजना रखडली आहे.सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले, लॉकडाउनमुळे अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे बँका व पतसंस्था यांनी दिलेल्या कर्जाची परिणामकारक वसुली होणार नाही. त्यामुळे या संस्थांच्या एनपीएमध्ये वाढ होऊन संस्थांचा नफा कमी होईल. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या संस्थांना भविष्यात तरलतेची (लिक्विडिटी) कमतरता भासेल.सहकारी संस्थांचे लेखे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार १५ मे पर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण विहीत मुदतीत (३१आॅगस्टपर्यंत) व वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत घेता येणार नाहीत.नोंदणी अडलीसहकार मंत्री, राज्यमंत्री व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांच्या स्तरावर अपिल व पुनर्रिक्षण अर्जांची सुनावणी घेता न आल्याने अशी प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. नवीन सहकारी संस्थांची नोंदणी, उपविधी दुरुस्ती व इतर कायदेशीर कामे खोळंबली आहेत.कृषी, पणन व कृषी प्रक्रिया संस्था, हातमाग / यंत्रमाग संस्था, सूतगिरण्या व इतर औद्योगिक सहकारी संस्थांच्या उत्पादनास व मालाच्या विक्रीस अडचणी येत असल्याने अशा संस्थांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.मध्यम व दीर्घ मुदत शेती कर्जाची वसुली कमी झाल्यामुळे विविध कार्यकारी सहकारी संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या थकबाकीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक सहकारी संस्थांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अशा संस्थांच्या कर्मचाºयांचे नियमित वेतन देण्यात अडचणी निर्माण होवू शकतील.२०१९-२० या आर्थिक वर्षात तोटा झालेल्या सहकारी संस्था त्यांच्या सभासदांना लाभांश देवू शकणार तसेच कर्मचाºयांना वार्षिक वेतनवाढ देवू शकणार नाहीत.पतसंस्थांच्या ठेवी घटल्यानागरी सहकारी पतसंस्थांमध्ये एजंटद्वारे दैनंदिन पिग्मी जमा केली जाते. लॉकडाउनमुळे पतसंस्थांच्या ठेवींचा ओघ कमी झाला आहे.साखर उद्योगावर संकटांचे ढगमुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट या बंदरात कामगारांची कमतरता असल्याने राज्यातील साखर निर्यातीवरदेखील परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमधील निबंर्धांमुळे देशांतर्गत साखर विक्री व्यवहारावर परिणाम झाला आहे. शेतकºयांना एफआरपीप्रमाणे देयके देण्यामध्ये अडचणी येत आहेत. पूर्वहंगामासाठी कामगारांचा तुटवडा भासत आहे.सहकार क्षेत्र आज कमालीचे अडचणीत आलेले आहे. ही परिस्थिती किती दिवस राहणार, त्यातून मार्ग कसा काढायचा यावर आम्ही काम करत आहोत. सहकार क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.- बाळासाहेब पाटील, मंत्री, सहकार विभाग.

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस