शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Coronavirus : म्हणून साथरोग नियंत्रण कायदा लागू - राजेश टोपे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 5:40 AM

साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे

‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याची ग्वाही देतानाच, साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे, एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी स्नेहा मोरे यांनी केलेली बातचीत...उपचारासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?राज्यामध्ये सर्वच जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष तयार करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे ६५० ते ७०० खाटा या माध्यमातून विलगीकरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांतून प्रवास केलेल्या व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकांतवासातील रुग्ण पळून जाऊ नये, याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विलगीकरण मान्य न करणाऱ्या रुग्णांना सक्तीने स्थानबद्ध करण्यात येईल.साठेबाजांवर काय कारवाई केली?मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात सॅनिटायझरसंबंधी तीन कारवाया, तर भिवंडी येथे मास्कसंबंधी कारवाई करण्यात आली आहे. केंद्र शासनानेही या संदर्भात अधिसूचना काढली असून, त्याद्वारे मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये केला आहे.प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत?राज्यात अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत यात्रा, सभा,समारंभ, परिषदा आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने खासगी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरातूनच काम करण्याची परवानगीची विनंती केली आहे.कोरोना धोकादायक आहे का?कोरोना हा विषाणूंचा समूह असून, सध्या ज्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे तो ‘कोविड १९’ हा कोरोना विषाणू या समूहातील नवीन आहे. साधारणपणे या विषाणूची लागण झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना याची लागण होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणपणे वयाची पन्नाशी उलटलेले आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अथवा अन्य आजारांची लक्षणे आहेत, अशांमध्ये त्याची लागण पटकन होऊ शकते.नागरिकांना काय आवाहन कराल?नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने घाबरू नये. स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गर्दी करू नये. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी करू नये. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरतात, त्यावर विश्वास ठेवू नये.मास्क वापरणे गरजेचे आहे का?सर्वसामान्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही. हातरुमाल वापरणे पुरेसे आहे. कोरोना आजार हवेतून पसरणारा नाही, तो शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे द्रव बाहेर पडते, त्याला हाताचा स्पर्श झाला आणि तो हात चेहºयावर, डोळे, नाक, तोंड येथे लागला, तर संसर्ग होऊ शकतो. हात साबणाने स्वच्छ धुवा, वारंवार चेहºयावर हात फिरवू नका. संभाषण करताना साधारणपणे समोरच्याशी तीन फुटांचे अंतर ठेवा, याचे पालन केल्यास सर्वच जण कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकतात.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार