शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 10:40 AM

९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते.

ठळक मुद्देलोकांच्या आग्रहास्तव स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णयझी मराठीवर दुपारी ४ ते ८ पाहता येणार मालिका डॉ. अमोल कोल्हे यांनी मानले रसिकांचे आभार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. अशातच लोकांनी घरातच राहावं यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा रामायण आणि महाभारत या मालिका दाखवणं सुरुवात केली आहे.

लोकांनी केलेल्या मागणीचा आग्रहास्तव या मालिका पुन:प्रक्षेपण करण्यात येत असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. ९० च्या दशकात रामायण आणि महाभारत या मालिकांमुळे लोक घरी असायचे. रस्त्यावरील वर्दळ कमी व्हायची असे चित्र होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पुन्हा या मालिका दाखवण्यात येत आहे. दूरदर्शनवर "रामायण" मालिका पुनर्प्रक्षेपित करण्याचा निर्णय झाला आणि महाराष्ट्रातून अनेकांनी मागणी केली की "स्वराज्यरक्षक संभाजी"मालिका पुन्हा प्रसारित करावी त्याप्रमाणे झी मराठी वाहिनीने स्वराज्यरक्षक संभाजी मालिका पुन्हा दाखवण्याचं ठरवलं आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, या मागणीनेच अतिशय आनंद झाला, समाधान वाटलं. आपल्या कलाकृतीची तुलना अप्रत्यक्षपणे आपण लहानपणी आदर्श मानलेल्या कलाकृतीशी होते ही बाब एक वेगळाच आनंद देऊन जाते.. त्यात अशाही काही पोस्ट पहिल्या की "लॉक डाऊन चा हेतू साध्य होण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेची मदत होईल. प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने केलेल्या गोष्टीचा असा प्रभाव पडत असेल तर कलाकाराला आणखी काय हवं? स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा भाग असल्याचा अभिमान वाटतो असं त्यांनी सांगितले.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका झी मराठीवर ३० मार्चपासून संध्याकाळी ४ ते ८ यावेळेत दाखवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर ही मालिका साकारण्यात आली आहे. संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे त्यांचा इतिहास महाराष्ट्रातील घरोघरी पोहचला. अनेकदा ही मालिका दबावामुळे बंद पडत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळी अनेक शिवप्रेमींनी ही मालिका सुरुच राहावी याची आग्रही मागणी केली होती. संभाजी महाराजांना झालेल्या अटकेमुळे रसिकांनी हळहळ व्यक्त केली होती. तसेच मालिकेच्या शेवटच्या दिवशी अनेक रसिकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पाहायला मिळालं होतं.

टॅग्स :Swarajya Rakshak Sambhajiस्वराज्य रक्षक संभाजीZee Marathiझी मराठीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस