शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Corona Virus: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना मिळणार ५० हजारांची मदत, ठाकरे सरकारची मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 11:34 PM

Corona Virus in Maharashtra: राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठ मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

मुंबई - जगभरासह महाराष्ट्रामध्येही गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या फैलावामुळे गंभीर संकट उभे राहिलेले आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाची लाट बऱ्यापैकी नियंत्रणात आलेली आहे. मात्र या काळात राज्यात कोरोनामुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठ मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

या मदतीसाठी एक स्वतंत्प पोर्टल तयार करण्यात येणार आहे. तसेच या पोर्टलवर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मदतनिधी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा केली जाईल. भारतातील राज्यांचा विचार केल्यास कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच सापडले आहेत. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावला असून, राज्य सरकारने कोरोनाबाबतचे सर्व निर्बंध जवळपास हटवले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने देशात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेला हिरवा झेंडा दाखवला होता. आता महाराष्ट्र सरकारने ही योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ६६ लाख ११ हजार ०७८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच राज्यातील सक्रिय रुग्णांचा विचार केल्यास एकूण १६ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे