शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 08:37 IST

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून मेरिटच्या आधारेच जागा दिल्या जातील. हे सरकार घालवणे हे पहिले काम आहे. राज्यात मविआचं सरकार येणार यात शंका नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं. 

मुंबई - जागावाटपाच्या चर्चेनंतर ते बाहेर आले, मी बाहेर आलो, आमचे कपडे फाटले नव्हते ना...महाविकास आघाडी म्हटलं तर काही माध्यमांना जे घडलं नसेल ते चढवून सांगायचे असा प्रयत्न सुरू झाला आहे. महाविकास आघाडीत संजय राऊत, मी, जयंत पाटील सर्व विषयांवर सामंजस्याने मार्ग काढत आहोत. आताचे सरकार महाराष्ट्रद्रोही आणि गुजरातधार्जिणे सरकार आहे. त्यामुळे हे सरकार घालवणे हे आमचे पहिले काम आहे. जागावाटप मेरिटच्या आधारे होतंय असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांसोबतच्या वादाच्या चर्चेवर भाष्य केले. 

राऊतांच्या वादावर नाना पटोले म्हणाले की, विदर्भात जास्त जागा काँग्रेसला मिळतील. ठाकरेंनी काही जागा मागितल्यात त्यावर विचार विनिमय होत आहे. त्यांचे मेरिट असेल तर त्यांना जागा देता येतील. कोकणात शिवसेना ठाकरे गट मोठा पक्ष आहे त्याठिकाणी त्यांना अधिक जागा मिळतील. आम्ही २८८ जागा महाविकास आघाडी म्हणूनच लढू. कुणी मोठा भाऊ, कुणी छोटा भाऊ नसेल. सर्व जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मतविभाजन कुठेही होता कामा नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही काळजी घेऊ. ज्या जागा काँग्रेसच्या मेरिटमध्ये असतील त्या आम्ही लढू, शिवसेनेच्या असतील त्या ते लढतील आणि राष्ट्रवादीच्या ते लढतील, काही जागांवर विचार विनिमय सुरू आहे. महाराष्ट्रातलं महाराष्ट्रद्रोही सरकारला बाहेर काढणे हे आमचे टार्गेट आहे. जनतेच्या आशीर्वादाने आम्ही राज्यात सत्तेत येणार आहे. त्यानंतर हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू असं त्यांनी सांगितले. न्यूज १८ लोकमतच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याशिवाय जे काही लोकसभेचं चित्र होते ते नरेंद्र मोदीविरुद्ध राहुल गांधी अशी लढाई होती. महाराष्ट्राने राहुल गांधींच्या पारड्यात जास्त मते टाकली. ज्यारितीने या सरकारने महाराष्ट्राला लुटलं, सगळे उद्योग गुजरातला पाठवले. उद्योग ओढण्याचं काम सुरू आहे. गुजरातचा विकास करण्यासाठी महाराष्ट्रात सरकार नाही. राज्यात किती उद्योग आंतरराष्ट्रीय पातळीवर आले त्याचे आकडे द्या. उद्योग आणले असा सरकारचा दावा असेल बेरोजगारी का वाढतेय? ज्या राज्याने उद्योगात प्रगती केली त्या राज्यात बेरोजगारी आपोआप कमी होते. फक्त राज्याच्या तिजोरीतून अनुदान दिले जाते, उद्योग चालतायेत की नाही असा सवाल नाना पटोलेंनी महायुती सरकारला विचारला. 

दरम्यान, मी महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात गेलो. भाजपाचे १०५ आमदार निवडून दिले, त्यामुळे या लोकांनी जाणीवपूर्वक लोकशाहीची हत्या केली अशी लोकांमध्ये चीड आहे. आमदारांना विकत घेऊन म्हणजे जनमत विकत घेऊन आम्ही काहीही करू शकतो. जे संविधानिक पदावर बसलेले तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एकनाथ शिंदेंना कुठलेही बहुमत नसताना थेट मुख्यमंत्री केले. हे प्रकरण कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने राज्यपालांवर आक्षेप घेतले. संविधाननिर्मात्यांची ही कर्मभूमी तिथेच लोकशाहीचा खून भाजपा करतेय हे लोकांना पटत नाही असा आरोप पटोलेंनी केला.

लोकशाही विकत घेणारी परंपरा पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली

माझ्या पक्षाने विधानसभा अध्यक्ष मला बनवलं, पक्षाने सांगितले राजीनामा देऊन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद घ्या, मी माझ्या पक्षाचा आदेश पाळणारा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून मी राजीनाम्याबद्दल सांगितले. मी राजीनामा दिला, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी माझा राजीनामा घेतला, तेदेखील आमच्या सरकारमधील घटक होते. १ वर्ष आमचा अध्यक्ष होऊ दिला नाही. ज्याकाही घटना घडल्या त्या बोलक्या आहेत. लोकशाहीला विकत घेणारी परंपरा महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही अशा शब्दात पटोलेंनी भाजपावर घणाघात केला. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४