शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 10:50 IST

शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल.

मुंबई :केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व कायद्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नागरिकत्व कायद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरली असून, त्यांनी वादग्रस्त टीका केली आहे.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या कायद्यामुळे केवळ मुस्लिम नागरिकांनाच नाही, तर हिंदू नागरिकांनादेखील नागरिकत्व सिद्ध करणे जड जाईल. त्यामुळे एनआरसी कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना शेलार यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, “शिवसेना सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. तर CAA हा कायदा केंद्राचा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, अशी वादग्रस्त टीका शेलारांनी यावेळी केली.

नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून राज्यातील सत्तेत असलेले काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधात भाजप नेत्यांचे युध्द रंगले आहे. तर राज्यात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनात तीनही सत्ताधारी पक्षातील नेते सहभाग घेत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून याच नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मोर्चे काढले जात आहे.

मागल्या दाराने नव्हे, छप्पर फाडूनच आलोय; उद्धव ठाकरेंचे विरोधकांना प्रत्युत्तर

..अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

म्हणे CAA लागू होऊ देणार नाही, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का? ; शेलारांची वादग्रस्त टीका'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल...तर मी मुख्यमंत्री झालोच नसतो, उद्धव ठाकरेंचे विधान 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAshish Shelarआशीष शेलारcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण