शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुंबईवर गुजराती लोकांचा ठसा उमटवायचं षडयंत्र; भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:25 IST

शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले असं जलील यांनी सांगितले.

औरंगाबाद - आम्ही इतके घाणेरडे राजकारण करणार नाही. सध्या दोन्ही शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावर राजकारण करतेय ते खूप घातक आहे. मुंबईत गुजराती लोकांचा ठसा उमटवायचा आहे. सर्वकाही गुजराती लोकांच्या हातात देण्याचं षडयंत्र सुरू आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी ही अहमदाबाद नाही तर मुंबई आहे असं सांगत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

इम्तियाज जलील म्हणाले की, गुजराती लोकांना मुंबईत बसवायचं आहे. कामगार गुजराती पाहिजे, उद्योगपती गुजराती पाहिजे. गुजराती लोकांना महाराष्ट्रात कसं आणायचं हे षडयंत्र सुरू आहे. आर्थिक राजधानी मुंबई आहे. गुजराती लोकांचा ठसा मुंबईत उमटवत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक संपू द्या. गुजराती लोकांची हुकुमत मुंबईवर ठेवायची आहे हे लोकांना अद्याप कळालं नाही. सध्या हे दुर्दैवी राजकारण आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले. दर ५ वर्षांनी केवळ हिंदुबाबत बोलून चालणार नाही. मुलभूत विकास कामांवर बोला, पाणीप्रश्नावर बोला. लोकांना आता पर्याय दिसू लागला आहे. MIM खासदार निवडून आल्यावर दंगली होणार असं म्हटलं. कुठे झाली दंगल? आम्ही सगळ्यांची कामे करतोय. एकमेकांवर चिखलफेक करण्याचं काम इतर राजकीय नेते करतायेत. परंतु ठोस कार्यक्रमावर कुणी काही बोलत नाही. अंधेरीची पोटनिवडणूक रस्त्यावर कशी लढाई होईल हे दिसणार आहे असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. 

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत पुढील महापौर MIM चा होईल. आम्ही विरोधी पक्षात होतो. आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केली. खान पाहिजे की बाण पाहिजे आता बाण गेला. औरंगाबादकरांना औरंगाबाद पाहिजे. नावही मिटलं आणि चिन्हही मिटले. नाव बदलून काय साध्य केले? निवडणूक आल्यावर औरंगाबाद पाहिजे की संभाजीनगर हवं असं विचारायचं. बाण राहिला असता तरी खान आला असता असा टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मराठी माणसं फोडण्याचं पाप

अमित शाह आणि मंडळींनी मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम केले. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी देणेघेणे नाही. जे कुणाला जमलं नाही ते अमित शाह यांनी मराठी माणसांना कमकुवत करण्याचं पाप केले आहे अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाAmit Shahअमित शाह