शहरं
Join us  
Trending Stories
1
"निकाल आल्यावर कुणाला दोष द्यायचा याची काहींची तयारी सुरु..."; मार्कर मुद्द्यावर CM चा टोला
2
...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
3
"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
4
BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
5
Maharashtra Municipal Election 2026 Voting LIVE Updates: “हे आम्ही खपवून घेणार नाही”; मतदान केल्यावर राज ठाकरेंचा इशारा
6
भाजप आणि शिंदे सेनेत राडा, काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण?
7
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
8
'या' देशाकडे आहे जगातील सर्वाधिक १,१०,००० मेट्रिक टन चांदी; पाहा भारताकडे किती आहे चांदीचा साठा
9
भोपाळमध्ये काळाचा घाला! मकर संक्रांतीच्यानिमित्ताने स्नानासाठी निघालेल्या ५ भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू
10
BMC Election 2026: मोठी बातमी! शाईऐवजी मार्कर निवडणूक आयोगानेच दिला, पुसला जातोय...; मुंबई आयुक्तांची कबुली
11
मतदान केंद्रात शिरला घोणस जातीचा विषारी साप, उडाली खळबळ
12
मुलानेच केला आईचा खून, बंदुकीतून झाडली गोळी, भयानक घटनेनं कोकण हादरलं, धक्कादायक कारण समोर आलं 
13
IIT इंजिनिअर बनला 'डिजिटल धोबी'! ८४ लाखांची नोकरी सोडून उभा केला १६० कोटींचा 'यूक्लीन' ब्रँड
14
६५-७० लढाऊ विमाने घेऊन अमेरिकेची युद्धनौका इराणच्या दिशेने निघाली; समुद्रात मोठी खळबळ...
15
सासू, पाच सुना आणि मुलगी, भीषण अपघातात झाला मृत्यू, अंत्यसंस्काराहून परतताना घडली दुर्घटना
16
"मैत्रीपूर्ण लढत कधीच होत नाही, हा केवळ..."; मनसे नेते राजू पाटील यांची शिवसेना-भाजप युतीवर टीका
17
Makar Sankranti 2026: मुलांच्या दीर्घायुष्यासाठी माता कुंतीने दिले होते 'हे' दान; यंदा तुम्हीही लुटा 'कुंतीचे वाण'
18
२१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
19
मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले...
20
PMC Election 2026: पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवर गुजराती लोकांचा ठसा उमटवायचं षडयंत्र; भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 15:25 IST

शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले असं जलील यांनी सांगितले.

औरंगाबाद - आम्ही इतके घाणेरडे राजकारण करणार नाही. सध्या दोन्ही शिवसेना भाजपाच्या इशाऱ्यावर राजकारण करतेय ते खूप घातक आहे. मुंबईत गुजराती लोकांचा ठसा उमटवायचा आहे. सर्वकाही गुजराती लोकांच्या हातात देण्याचं षडयंत्र सुरू आहे. कारण देशाची आर्थिक राजधानी ही अहमदाबाद नाही तर मुंबई आहे असं सांगत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. 

इम्तियाज जलील म्हणाले की, गुजराती लोकांना मुंबईत बसवायचं आहे. कामगार गुजराती पाहिजे, उद्योगपती गुजराती पाहिजे. गुजराती लोकांना महाराष्ट्रात कसं आणायचं हे षडयंत्र सुरू आहे. आर्थिक राजधानी मुंबई आहे. गुजराती लोकांचा ठसा मुंबईत उमटवत नाही तोपर्यंत काही साध्य होणार नाही. एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक संपू द्या. गुजराती लोकांची हुकुमत मुंबईवर ठेवायची आहे हे लोकांना अद्याप कळालं नाही. सध्या हे दुर्दैवी राजकारण आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच शिवसेनेत फूट झाली म्हणून आम्हाला फायदा मिळेल असं नाही. आमचे काम बघून लोक आमच्यासोबत आले. दर ५ वर्षांनी केवळ हिंदुबाबत बोलून चालणार नाही. मुलभूत विकास कामांवर बोला, पाणीप्रश्नावर बोला. लोकांना आता पर्याय दिसू लागला आहे. MIM खासदार निवडून आल्यावर दंगली होणार असं म्हटलं. कुठे झाली दंगल? आम्ही सगळ्यांची कामे करतोय. एकमेकांवर चिखलफेक करण्याचं काम इतर राजकीय नेते करतायेत. परंतु ठोस कार्यक्रमावर कुणी काही बोलत नाही. अंधेरीची पोटनिवडणूक रस्त्यावर कशी लढाई होईल हे दिसणार आहे असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला. 

दरम्यान, औरंगाबाद महापालिकेत पुढील महापौर MIM चा होईल. आम्ही विरोधी पक्षात होतो. आमच्या नगरसेवकांनी चांगले काम केली. खान पाहिजे की बाण पाहिजे आता बाण गेला. औरंगाबादकरांना औरंगाबाद पाहिजे. नावही मिटलं आणि चिन्हही मिटले. नाव बदलून काय साध्य केले? निवडणूक आल्यावर औरंगाबाद पाहिजे की संभाजीनगर हवं असं विचारायचं. बाण राहिला असता तरी खान आला असता असा टोला इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 

मराठी माणसं फोडण्याचं पाप

अमित शाह आणि मंडळींनी मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम केले. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांच्याशी देणेघेणे नाही. जे कुणाला जमलं नाही ते अमित शाह यांनी मराठी माणसांना कमकुवत करण्याचं पाप केले आहे अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपावर निशाणा साधला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाAmit Shahअमित शाह