शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
4
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
5
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
6
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
7
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
8
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
9
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
10
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
11
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
12
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
13
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
14
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
15
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?
16
परदेशी माध्यमांचा मोदींवर एवढा राग का ?
17
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
18
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
19
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
20
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 

काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:45 PM

माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी राणेंकडे देण्यात आली होती. हा प्रयत्न फसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या वादावर खरी ठिणगी पडल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. 

एबीपी माझाकडे या आत्मचरित्राची काही पाने उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केलेल्या दाव्यानुसार नारायण राणे यांनी शिवसेनेच्या आताच्या परिस्थितीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना जबाबदार धरले आहे. माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. पद्धतशीरपणे त्यांनी विरोधी नेत्यासाठी सुभाष देसाईंचं नाव पुढे केलं, असा आरोप राणे यांनी केला आहे. 

तसेच 1999 मध्ये विलासराव देशमुखांचे सरकार पाडण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याची जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार मातोश्री क्लबवर आले होते. तेथे उद्धव ठाकरे आले होते. तेथे त्यांना राणे नसल्याचे सांगण्यात आले. बाळासाहेब आणि जॉर्ज फर्नांडीस यांच्या भेटीनंतर ही योजना वेगळ्या वळणावर गेली. विलासरावांनी बहुमत सिद्ध केले. मात्र, यानंतर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचा दावा राणे यांनी यामध्ये केला आहे. 

...तेव्हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी; नारायण राणेंचा आत्मचरित्रात गौप्यस्फोट

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस