शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 21:00 IST

Congress Ramesh Chennithala News: राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. भारत एक आहे, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे.

Congress Ramesh Chennithala News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतून महायुतीत अनेक नेते, पदाधिकारी यांचा प्रवेश मोठ्या प्रमाणावर होत आहे. ठाकरे गटासह काँग्रेसलाही आता एकामागून एक धक्के बसत आहेत. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत खलबते झाली. काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत बैठकांना उपस्थिती दर्शवली. यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबाबतची रणनीती काय असेल, याबाबत सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काय भूमिका घ्यायची आहे, त्यासाठी सात तारखेला बैठक होणार आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. आमचे सचिव व्यंकटेश आणि मी त्या बैठकीत सहभागी होणार आहोत. ०७ तारखेला अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली. तसेच कार्यकर्त्यांनी भावना अशी आहे की, प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढले पाहिजे. सर्व ठिकाणी उमेदवार दिले पाहिजेत. कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही स्थानिक पातळीवरील निवडणूक आहे. यावर अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, असे चेन्नीथला यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काँग्रेस त्यांच्यासोबत जाणार का, असा प्रश्न रमेश चेन्नीथला यांना विचारण्यात आला. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारत असे काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेसने मजबूत केले आहे. त्यांना अनेकदा संधी दिली आहे. काँग्रेस आपली विचारधारा घेऊन पुढे जाईल. जर राज ठाकरे सोबत येण्याबाबत काही होत असेल, तर त्याचे काय करायचे त्यावर नंतर विचार केला जाईल. अजून तरी ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे निश्चित झालेले नाही. परंतु, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत ७ तारखेला आम्ही निर्णय घेणार आहोत, असे चेन्नीथला यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, बैठकीत संघटना मजबूत करण्यावर आमची चर्चा झाली. पुढे काय केले पाहिजे, यावर मंथन झाले. यात सर्वांनी आपली मते मांडली. आगामी तीन महिन्यात पक्षाची वाटचाल कशी असेल, याबाबत काही गोष्टी ठरवण्यात आल्या आहेत. आघाडी कायम ठेवायची की नाही, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्लीतील ही बैठक झाल्यानंतर आता महाराष्ट्रात जिल्हा, विभागवार पातळीवरील नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२५MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे