Rahul Gandhi: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने बुधवारी काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी विविध जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी अनेकांनी चिखल झालेली पिके दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजुनही अनेक गावांना पुराचा वेढा असून पिकांसह घरांमध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.
महापुरामुळे अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकरी आणि लोकांना धीर देण्यासाठी सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील उजनी, औराद शहाजानी, सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना येथे नुकसानाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माढा तालुक्यात तर एकनाथ शिंदे यांनी भूम परांडा भागात आपत्तीग्रस्तांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी
महाराष्ट्रातील मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात सर्व पीडित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. सरकार आणि प्रशासनाला मदतकार्याला गती देण्याचे आणि पिकांच्या नुकसानाचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांना पूर्ण मदत करण्याचे आवाहन करत आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना प्रशासनाला सहकार्य करण्याची आणि गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मराठवाड्यात जो आलेला महाप्रलय आहे, मराठवाड्यात जे अस्मानी संकट आले आहे. सातत्याने दोन ते तीन दिवस झालेला प्रचंड पावसामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला शेतकरी, नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ५० लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
Web Summary : Rahul Gandhi appealed to the Maharashtra government to expedite assistance to flood-affected farmers in Marathwada. He urged assessment of crop damage and full support. Congress workers are asked to cooperate with administration.
Web Summary : राहुल गांधी ने महाराष्ट्र सरकार से मराठवाड़ा में बाढ़ प्रभावित किसानों को तत्काल सहायता प्रदान करने का आग्रह किया। उन्होंने फसल नुकसान का आकलन करने और पूर्ण समर्थन देने की अपील की। कांग्रेस कार्यकर्ताओं से प्रशासन के साथ सहयोग करने का आग्रह किया गया है।