शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

सोमवारी श्रेष्ठींच्या नाराजीची, तर आता पटोले यांच्या समर्थनाची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 09:09 IST

तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण.

ठळक मुद्देतणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण.भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण हे त्यांचे त्यांनी ठरवावे, वडेट्टीवारांची टीका.

मुंबई : एखादे चुकीचे मत पुढे आले, तर महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल. त्यामुळे तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील. जर काही कुरबुरी झाल्यात, तर काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोघे संवाद साधण्याचे काम करतील, या शब्दांत काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी मंगळवारी नाना पटोले यांची पाठराखण केली. मात्र, वादग्रस्त विधाने कोणीच करू नयेत, अशी भूमिकाही मांडली.

सोमवारी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत, असे सांगत होते. मात्र, मंगळवारी ‘लोकमत’मध्ये ‘नाना पटोले यांना राहुल गांधी यांचा वरदहस्त’ अशी बातमी प्रकाशित झाली आणि पत्रकार परिषदेत सगळ्याच नेत्यांनी पटोले यांची पाठराखण केली. जो काही वाद निर्माण झाला त्याचे खापर पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी माध्यमांवर फोडले. पटोले यांचे विधान मोडतोड करून माध्यमांनी दाखवले. पटोले यांच्या बोलण्याचा रोख केंद्र सरकारवर होता. आता हा विषय पूर्णपणे संपला आहे, असेही पाटील म्हणाले. 

काँग्रेसने महागाईच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक भाजप अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहे, असा आरोप खुद्द पटोले यांनी केला. अन्य नेत्यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आहेत. ज्या पद्धतीने भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यातून भाजपचा डाव स्पष्ट दिसून येतो, असा आरोपही पटोले यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरणाची अंमलबजावणी करताना पोरखेळ केला आहे, असा आक्षेप नोंदवला. 

भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण? भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण हे त्यांचे त्यांनी ठरवावे. त्यांचीच सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव आणि अंगणही त्यांचेच, त्यामुळे महाभारतही तिकडेच आहे. ते त्यांनाच लखलाभ राहो, अशी टीका मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाPoliticsराजकारणAshok Chavanअशोक चव्हाणBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात