शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

पाण्यासाठी भाजपचे आंदोलन म्हणजे 'मगरीचे अश्रू' : अनिल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:57 PM

जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही.

औरंगाबाद : पंकजा मुंडे आणि भाजपच्या नेत्यांचे मराठवाड्याच्या सिंचन प्रश्नावर उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असून सत्ता गेल्यावर त्यांना मराठवाड्याची आठवण आली असल्याची टीका माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांनी केली आहे. औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या CAA विरोधातील उपोषणास्थळी भेट दिली असताना ते बोलत होते.

गेल्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. एवढचं नाही तर पाणीपुरवठा मंत्री सुद्धा भाजपचाचं होता. त्याचप्रमाणे जलसंधारण मंत्री सुद्धा मराठवाड्यातील होते. असे असताना सुद्धा भाजपला मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवता आला नाही. मात्र आता त्याच भाजपची नेतेमंडळी उपोषणाला बसत आहेत. त्यामुळे भाजपचे हे उपोषण म्हणजे 'मगरीचे अश्रू' असल्याचे पटेल म्हणाले.

राज्यभरात CAA ला विरोध करण्यासाठी सर्वच धर्मातील लोकं एकत्र येऊन आंदोलन, उपोषण करत आहे. त्यामुळे लोकांचे या सर्व गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे नेते असे काही उपोषण करत आहे. पाच वर्षे सत्ता असताना सुद्धा पाणी प्रश्नावर काहीच केलं नाही. मात्र आता सत्ता जाताच यांना मराठवाड्यातील पाणी प्रश्न आठवत असल्याचा टोला सुद्धा त्यांनी यावेळी भाजपला लगावला.